Maharashtra Political news :
मुंबई : शिवसेना (UBT) पक्षाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांच्याशी संबंधित साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम (Sadanand Kadam Arrested) यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ED) अटक केलं आहे. आज (शुक्रवारी) १० मार्चला सकाळी सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतलं होतं. तर दुसऱ्या बाजूला विधानसभेत जातीवरुन खत हा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला. सांगलीमध्ये शेतकऱ्यांना रासायनिक खत खरेदी करण्यासाठी जात नमूद करावी लागत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावरुन मोठा गदारोळ झाला. काय घडलं महाराष्ट्राच्या राजकारणात? ५ मोठ्या बातम्या (Big political happening in Maharashtra)
सोमय्यांची बातमी खरी ठरली! सदानंद कदम यांना ईडीकडून अटक
Anil Parab vs Kirit Somaiya: साई रिसॉर्टप्रकरणी ईडीने अनिल परबांचे बिझनेस पार्टनर असलेल्या सदानंद कदम यांना अटक केलं आहे. त्यामुळे आता अनिल परब यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
वाचा सविस्तर : https://bit.ly/42427Hq
Sangli : ‘आधी जात, मग खत…’; सरकारच्या अजब कारभारानं शेतकऱ्यांमध्ये प्रचंड चीड
Sangli : खत खरेदी करताना जातीची विचारणा? शेतकरी हीच आमची जात आहे. शेतकऱ्याच्या पोटाला जात नसते, अजित पवारांची रोकठोक प्रतिक्रिया
वाचा सविस्तर : https://bit.ly/3J9Vvyz
रामदास आठवलेंची शरद पवारांना खुली ऑफर; राष्ट्रवादी भूमिका बदलणार?
Ramdas Athawale | Sharad Pawar : नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससह जनता दल युनाटेड आणि इतर पक्षांनीही एनडीपीपी-भाजप आघाडीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.
वाचा सविस्तर : https://bit.ly/3yu2rSc
Sanjay Raut: ‘मनसेच्या वाटेला जाण्याइतकं त्यांचा पक्ष..’, खोचक प्रत्युत्तर
Raj Thackeray vs Sanjay Raut: आमच्या वाटेला गेल्याने मुख्यमंत्रिमपद गेलं असं वक्तव्य करून उद्धव ठाकरेंना डिवचणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आता संजय राऊत यांनी खोचक शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे.
वाचा सविस्तर : https://bit.ly/3F9YHsU
‘वाटेल तेवढ्या खोक्यांचा वापर करायचा अन्’, ठाकरेंनी फडणवीसांना डिवचलं!
देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आता सामनाच्या अग्रलेखातून त्यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात आली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे फक्त योजनांचा पाऊस असल्याचे यावेळी म्हटलं आहे.
वाचा सविस्तर : https://bit.ly/3YBSixo