‘चुंबन, भीती आणि ‘नाटू-नाटू’, संजय राऊतांची ‘रोखठोक’ टीका, कोणावर निशाणा?

मुंबई तक

Sanjay Raut Rokthok Column : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी रोखठोकमध्ये विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. त्यांनी ‘चुंबन, भीती आणि ‘नाटू नाटु’ या मथळ्याखाली आजचा रोखठोक सदर लिहिला आहे. त्यांनी केंद्र आणि राज्यसरकारवर सडकून टीका केली. प्रामुख्याने शिंदेंवर त्यांचा जास्त रोख होता. त्यांनी लिहलंय, महाराष्ट्राचं सरकारही मोदींप्रमाणे (Narendra […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Sanjay Raut Rokthok Column : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी रोखठोकमध्ये विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. त्यांनी ‘चुंबन, भीती आणि ‘नाटू नाटु’ या मथळ्याखाली आजचा रोखठोक सदर लिहिला आहे. त्यांनी केंद्र आणि राज्यसरकारवर सडकून टीका केली. प्रामुख्याने शिंदेंवर त्यांचा जास्त रोख होता. त्यांनी लिहलंय, महाराष्ट्राचं सरकारही मोदींप्रमाणे (Narendra Modi) बेकायदेशीर पद्धतीने राज्य चालवत आहेत. शिवसेनेच्या शाखांत पोलीस घुसवून शिंदे गटाचे लोक ताबा मिळवत आहेत. पोलीसी बळाचा वापर करून कार्यालयावर ताबा मिळवाल, पण जनभावना कशी विकत घ्याल? असा सवाल त्यांनी केला. (‘Kissing, Fear and ‘Natu-Natu’, Sanjay Raut’s ‘Rokhthok’ criticism, who is the target?)

चुंबन प्रकरणावर राऊतांचे सवाल

यासह रोखठोकमध्ये संजय राऊतांनी आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे यांच्या प्रकरणावर देखील सरकारला घेरलं. त्यांनी लिहलंय महाराष्ट्रात सध्या एका जाहीर चुंबनाचे प्रकरण सगळ्यांचेच मनोरंजन करीत आहे. शिंदेंच्या आमदाराने त्यांच्याच महिला पदाधिकाऱ्यांचे जाहीर चुंबन घेतले. त्याचे पडसाद उमटत आहेत. मुख्यमंत्र्याच्या उपस्थित हे चुंबन प्रकरण घडलं. शिवसेनेच्या तरुण कार्यकर्त्यांना घरात धाडी टाकून पकडण्यात आलं. मुळात चुंबन घेणं कायद्याने गुन्हा आहे का? नसेल तर मग शिवसैनिकांना अटक करण्याचे कारण काय?असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.

शीतल म्हात्रेंच्या Viral व्हिडीओवर प्रकाश सुर्वेंनी सोडलं मौन, म्हणाले…

यावरच पुढे बोलताना राऊतांनी लिहलंय, संबंधित आमदार आणि महिलेला चुंबन प्रकारचा मनस्ताप झाला हे मान्य केले तरी, सार्वजनिक ठिकाणी केलेले साधे चुंबन अश्लील कृत्यात मोडते काय याचा खुलासा व्हावा व अटक केलेल्या शिवसैनिकांची सुटका व्हावी, अशी मागणी राऊतांनी रोखठोकमध्ये केलीय. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांनी फडणवीस यांच्याबरोबर सरळ लव्ह जिहादचाच प्रकार केला व उघडपणे अनैतिक पद्धतीने एकत्र राहत आहे, यास काय म्हणावे? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

हे वाचलं का?

    follow whatsapp