नजर हटी…: मोबाईवर बोलणाऱ्या ड्रायव्हरने ब्रेक दाबून मृत्यूलाच दिलं निमंत्रण; 6 जणांचे गेले प्राण

मुंबई तक

-विजयकुमार बाबर, प्रतिनिधी अनेकदा मोबाईलमुळे आजूबाजूला कोण आहे, याचंही भान अनेकांना राहत नाही. अगदी व्यसनप्रमाणे अनेकजण मोबाईलमध्ये गुंग असतात. पण याच मोबाईल वेडामुळे सहा जणांचे प्राण गेल्याचं समोर आलं आहे. सोलापूर-अक्कलकोट मार्गावर झालेला जीपचा अपघात टायर फुटून नव्हे, तर मोबाईलवर बोलणाऱ्या चालकाने अचानक खड्डा आल्यानंतर ब्रेक लावल्याने झाल्याचं समोर आलं आहे. एका प्रत्यक्षदर्शी प्रवाशांने हा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

-विजयकुमार बाबर, प्रतिनिधी

अनेकदा मोबाईलमुळे आजूबाजूला कोण आहे, याचंही भान अनेकांना राहत नाही. अगदी व्यसनप्रमाणे अनेकजण मोबाईलमध्ये गुंग असतात. पण याच मोबाईल वेडामुळे सहा जणांचे प्राण गेल्याचं समोर आलं आहे. सोलापूर-अक्कलकोट मार्गावर झालेला जीपचा अपघात टायर फुटून नव्हे, तर मोबाईलवर बोलणाऱ्या चालकाने अचानक खड्डा आल्यानंतर ब्रेक लावल्याने झाल्याचं समोर आलं आहे. एका प्रत्यक्षदर्शी प्रवाशांने हा दावा केला आहे.

सोलापूर जिल्ह्यात अनेक महिन्यांनंतर एक भीषण अपघात झाला आहे. या ठिकाणी सगळ्याच रस्त्यांचं चौपदरीकरण झालं आहे त्यामुळे अपघातांचं प्रमाण कमी झालं आहे. अशात मंगळवारचा दिवस अक्कलकोटहून सोलापूरला येणाऱ्या प्रवाशांसाठी घातवार ठरला. जीपचा चालक मोबाईलवर बोलत होता त्यामुळे हा अपघात झाला, असा आरोप एका प्रवाशाने केला आहे.

प्रवासी जीपमधून प्रवास करणारे तब्बल पाच जण जागीच ठार झाले तर उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झालाय.सहा जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून आद्यप एक प्रवाशी गंभीर जखमी आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp