भयंकर! इंदूरवरून अमळनेरला येणारी बस नर्मदा नदीत कोसळली, १३ प्रवासी जागीच ठार
मध्य प्रदेशातील इंदौरवरून जळगाव जिल्ह्यातील अमळनेरकडे निघालेल्या प्रवासी बसवर काळाने झडप घातली. सकाळी दहा ते सव्वादहा वाजेच्या सुमारास भरधाव बस मध्य प्रदेशातील खलघाट आणि ठिगरी दरम्यान असलेल्या पुलावरून नर्मद नदीच्या पात्रात कोसळली. यात १३ प्रवासी जागीच ठार झाले. मध्य प्रदेशातील खलघाटजवळ सोमवारी सकाळी प्रवासी बस दुर्घटनाग्रस्त झाली. ५५ प्रवाशांना घेऊन जळगाव जिल्ह्यातील अमळनेरकडे येत असलेली […]
ADVERTISEMENT

मध्य प्रदेशातील इंदौरवरून जळगाव जिल्ह्यातील अमळनेरकडे निघालेल्या प्रवासी बसवर काळाने झडप घातली. सकाळी दहा ते सव्वादहा वाजेच्या सुमारास भरधाव बस मध्य प्रदेशातील खलघाट आणि ठिगरी दरम्यान असलेल्या पुलावरून नर्मद नदीच्या पात्रात कोसळली. यात १३ प्रवासी जागीच ठार झाले.
मध्य प्रदेशातील खलघाटजवळ सोमवारी सकाळी प्रवासी बस दुर्घटनाग्रस्त झाली. ५५ प्रवाशांना घेऊन जळगाव जिल्ह्यातील अमळनेरकडे येत असलेली बस खरगोन आणि धार जिल्ह्याच्या सीमेवर पुलावरून नर्मदा नदीपात्रात कोसळली.
दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने मदत व बचाव कार्य सुरू केलं. खरगोन धारचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकानीही घटनास्थळाला भेट दिली.
पोलीस अधीक्षक धर्मवीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार १३ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, तर १५ जण जखमी अवस्थेत आढळले. बाहेर काढण्यात आलेल्या प्रवाशांपैकी ५ ते ७ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.