ठाकरे सरकारने पाठवलेली 12 आमदारांची नावं CM शिंदेंकडून मागे; अजित पवार म्हणतात…
अहमदनगर : शिंदे सरकराने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे सरकारकडून करण्यात आलेली १२ आमदारांची शिफारस मागे घेण्यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना एक पत्र पाठवले आहे. या पत्रानुसार जुनी नावं मागे घेऊन शिंदे सरकारकडून नवीन नावं पाठवली जाणार आहेत. शिंदे […]
ADVERTISEMENT

अहमदनगर : शिंदे सरकराने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे सरकारकडून करण्यात आलेली १२ आमदारांची शिफारस मागे घेण्यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना एक पत्र पाठवले आहे. या पत्रानुसार जुनी नावं मागे घेऊन शिंदे सरकारकडून नवीन नावं पाठवली जाणार आहेत.
शिंदे यांच्या या निर्णयाबाबत बोलताना तत्कालिन उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी ‘आता जनतेने ठरवायचे आहे’, असे म्हणत प्रतिक्रिया दिली आहे. पवार म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने 12 आमदारांच्या पाठवलेल्या यादीवर राज्यपालांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. आम्ही लोकशाही पद्धतीने आलेल्या सरकारने कॅबिनेटचा ठराव करून संबंधित नाव दिली होती.
‘शिल्लक राहिलेली काँग्रेस आम्ही वाटून घेऊ’; एकनाथ शिंदेंच्या समोर नारायण राणे काय म्हणाले?
आम्ही अनेकदा राज्यपाल महोदयांना भेटायला गेलेलो होतो. ते म्हणायचे की मी त्याच्यात बघतोय, माझं चालू आहे. परंतु तेव्हा तर काही झालं नाही. आता शेवटी राज्यपाल एक एवढी मोठी व्यक्ती, त्यांना एवढा अधिकार आहे. त्यामुळे आता त्या संदर्भामध्ये आम्ही काय टीका टिपणी करू शकत नाही, आता जनतेने ठरवायचे आहे, असेही पवार म्हणाले.