‘सावध रहा, भाजप कोरोनापेक्षाही भयंकर’; कौतुकानंतर अमोल मिटकरींची टीका

मुंबई तक

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजप कोरोनापेक्षाही भयंकर आहे. भाजपचा जिवाणू मेंदूत गेला, तर माणूस मेल्यानंतरही बरा होऊ शकत नाही, असं म्हणत अमोल मिटकरींनी टीका केलीये. त्याचबरोबर अमोल मिटकरींनी भाजपच्या संघटनांचं कौतूकही केलंय. नागपूरमध्ये गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा पार पडला. जयंत पाटील, अजित पवार आणि छगन भुजबळ या कार्यक्रमात […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजप कोरोनापेक्षाही भयंकर आहे. भाजपचा जिवाणू मेंदूत गेला, तर माणूस मेल्यानंतरही बरा होऊ शकत नाही, असं म्हणत अमोल मिटकरींनी टीका केलीये. त्याचबरोबर अमोल मिटकरींनी भाजपच्या संघटनांचं कौतूकही केलंय.

नागपूरमध्ये गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा पार पडला. जयंत पाटील, अजित पवार आणि छगन भुजबळ या कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना आमदार अमोल मिटकरी म्हणाले, ‘अजित पवारांनी कोरोना असतानाही आमदारांचा विकास निधी 5 कोटी केला. जलसंपदा मंत्री असताना जयंत पाटलांनी नळगंगा-वैनगंगा प्रकल्प दिला. नदीजोड प्रकल्पाचं त्यांचं स्वप्न होतं.’

पुढे बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, “या सरकारने आनंदाचा शिधा आणला. कंत्राटदाराला दिलं. किती लोकांना भेटलं. मंत्र्यांना विचारलं, मंत्री म्हणाले, दिवाळी तुळशी विवाहापर्यंत असते. त्यांनी काही केलं नाही, तरीही त्यांचे प्रचारक आहेत. आपण शांत असतो. जनतेपर्यंत आपण पोहोचत नाही.”

अजित पवारांवर महाविकास आघाडीचे आमदार नाराज? नरमाईच्या भूमिकेवर आक्षेप