भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र येण्याच्या हालचालींना वेग?
20 जून रोजी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये भाजपसोबत जाणं कसं हिताचं आहे याचा उल्लेख आहे. तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष शिवसेना संपवू पाहात आहेत असंही म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपसोबत जाणं पक्षाच्या दृष्टीने योग्य ठरेल असा […]
ADVERTISEMENT

20 जून रोजी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये भाजपसोबत जाणं कसं हिताचं आहे याचा उल्लेख आहे. तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष शिवसेना संपवू पाहात आहेत असंही म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपसोबत जाणं पक्षाच्या दृष्टीने योग्य ठरेल असा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे.
आमदार प्रताप सरनाईक हे उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जातात. ते सध्या ED म्हणजेच अंमलबजावणी संचलनालयाच्या रडारवर आहेत. नॅशनल स्पोर्ट एक्स्चेंज लिमिटेड अर्थात NSEL चा 5600 कोटींच्या घोटाळ्यात सरनाईक यांच्यावर आरोप झाले आहेत. त्यामुळे सरनाईक यांनी लिहिलेल्या पत्रानंतर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. काही जणांचं म्हणणं आहे की प्रताप सरनाईक यांनी लिहिलेलं पत्र म्हणजे कातडी बचाव धोरणाचा भाग आहे. मात्र त्यांनी लिहिलेल्या पत्रामुळे आता एकेकाळचा सहकारी आणि मित्र पक्ष, तसंच सध्या कट्टर विरोधात असलेला भाजपसोबत शिवसेना जाऊ शकते या चर्चांना उधाण आलं आहे.
1989 पासूनच शिवसेना आणि भाजप हे दोन पक्ष एकाच विचारसरणीचे पक्ष म्हणून ओळखले जातात. शिवसेना आणि भाजप युतीचं सरकार दोनदा महाराष्ट्रात आलं आहे. पहिल्यांदा आलं तेव्हा शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले होते. तसंच उर्वरित सहा ते आठ महिन्यांचा काळ नारायण राणे युतीच्या सत्तेत असताना मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते. २०१४ मध्ये पुन्हा एकदा युतीचं सरकार आलं तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. 2019 मध्ये भाजप, शिवसेना आणि मित्र पक्षांच्या महायुतीलाच जनमताचा कौल मिळाला होता. या निवडणुकीत भाजपला 105 तर शिवसेनेला 56 जागी विजय मिळाला. युतीचं सरकार येणार हे निश्चित होतं मात्र मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष वाटून घेण्याच्या फॉर्म्युल्यावरून ही युती फक्त तुटलीच नाही तर दुभंगली. ज्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुढाकार घेऊन हा प्रयोग यशस्वी करून दाखवला. सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे कामकाज सांभाळत आहेत.
शिवसेना आणि भाजप यांच्यात टोकाचा संघर्ष निर्माण झालेला असताना आता हे दोन्ही पक्ष एकत्र येतील अशी चर्चा रंगली आहे. याची कारणं जाणून घेऊ.