नाना पटोलेंच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांची जबरदस्त गुगली!

मुंबई तक

काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी आज (४ फेब्रुवारी) विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकारमधील सत्तेची गणितं पुन्हा एकदा बदलली आहे. याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अत्यंत सूचक असं वक्तव्य केलं आहे. कारण आता विधानसभा अध्यक्ष निवडण्यासाठी आता तीनही पक्षात पुन्हा एकदा चर्चा केली जाणार आहे. स्वत: शरद पवार यांनी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी आज (४ फेब्रुवारी) विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकारमधील सत्तेची गणितं पुन्हा एकदा बदलली आहे. याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अत्यंत सूचक असं वक्तव्य केलं आहे. कारण आता विधानसभा अध्यक्ष निवडण्यासाठी आता तीनही पक्षात पुन्हा एकदा चर्चा केली जाणार आहे. स्वत: शरद पवार यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या वाट्याला गेलेलं विधानसभा अध्यक्षपद आता नेमकं कोणत्या पक्षाकडे जाणार यावरुन राजकीय वर्तुळात अनेक अंदाज वर्तवले जात आहेत. त्यामुळे आता अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना देखील जोर लावणार आहे.

पाहा शरद पवार नेमकं काय म्हणाले?

दरम्यान, याविषयी ‘मुंबई तक’शी बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘काँग्रेसने विधानसभा अध्यक्ष बदलताना आमच्याशी चर्चा केली आहे. काँग्रेस पक्षांतर्गत दबाव असल्याने विधानसभा अध्यक्ष बदलाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष पदावर पुन्हा चर्चा होणार आहे. विधानसभा अध्यक्षपद हे तीन पक्षाचं होतं. जे आता पुन्हा खुलं झालं आहे.’

ते पुढे असंही म्हणाले की, ‘2019 साली ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार अध्यक्षपद हे काँग्रेसला देण्याचं ठरलं होतं. पण त्यावेळी असं नव्हतं ठरलं की, अध्यक्ष वर्षभरानंतर राजीनामा देतील.’ असं म्हणत शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे की, विधानसभा अध्यक्षपदावर आता तीनही पक्ष दावा करु शकतात.

हे वाचलं का?

    follow whatsapp