“उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील याच भीतीने भाजपने शिवसेना फोडली” वरूण सरदेसाईंचा दावा

मुंबई तक

उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होतील याच भीतीने भाजपने शिवसेना फोडली अशी टीका युवासेनेचे सचिव वरूण देसाई यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षातील क्रमांक दोनचे नेते होते. त्यांचे पक्षातील सगळ्या नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांसोबत चांगले संबंध होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जवळचे नेते एकनाथ शिंदे मानले जात होते. तरीही त्यांनी बंडखोरी केली असं […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होतील याच भीतीने भाजपने शिवसेना फोडली अशी टीका युवासेनेचे सचिव वरूण देसाई यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षातील क्रमांक दोनचे नेते होते. त्यांचे पक्षातील सगळ्या नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांसोबत चांगले संबंध होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जवळचे नेते एकनाथ शिंदे मानले जात होते. तरीही त्यांनी बंडखोरी केली असं वरूण सरदेसाईंनी केली आहे. उस्मानाबादमध्ये ते बोलत होते.

एकनाथ शिंदे राज ठाकरेंना दसरा मेळाव्याला बोलवणार? मुख्यमंत्री म्हणाले..

नेमकं काय म्हणाले आहेत वरूण सरदेसाई?

उद्धव ठाकरे पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले असते तर २०२४ ला पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार होऊ शकतात. तसंच सगळ्या भाजपविरोधी पक्षांचा त्यांचा पाठिंबा मिळाला असता आणि ते पंतप्रधान होतील या भीतीने भाजपने शिवसेना फोडली असा दावा वरूण सरदेसाईंनी केला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपचा हात पकडला. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत शिवसेनेच्या ४० आमदारांना घेऊन बंड केलं. त्यामुळेच महाविकास आघाडीच सरकार कोसळलं. महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन करण्यामागे भाजपचा हात होता हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मान्य केलं आहे असं म्हणत शिवसेना का फोडली याचं कारण वरूण सरदेसाईंनी सांगितलं आहे.

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निर्णय लांबणीवर; घटनापीठासमोरील पुढील सुनावणी 27 सप्टेंबरला

हे वाचलं का?

    follow whatsapp