महाराष्ट्रात तीन पक्षांनी जनमताची चोरी केली, गोव्यात आम्ही असं घडू देणार नाही-फडणवीस
गोवा, उत्तर प्रदेशसर पाच राज्यांच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता वेग आला होता राजकीय घडामोडींना. गोव्यात परिवर्तन नक्की होईल असं संजय राऊत यांनी मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. तर तिकडे गोवा भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यात पुन्हा भाजपच येणार असल्याचा दावा केला आहे. उत्तर प्रदेशातही भाजपला बहुमत मिळेल असाही विश्वास […]
ADVERTISEMENT

गोवा, उत्तर प्रदेशसर पाच राज्यांच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता वेग आला होता राजकीय घडामोडींना. गोव्यात परिवर्तन नक्की होईल असं संजय राऊत यांनी मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. तर तिकडे गोवा भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यात पुन्हा भाजपच येणार असल्याचा दावा केला आहे. उत्तर प्रदेशातही भाजपला बहुमत मिळेल असाही विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग होईल का असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला होता त्यावर आमचे प्रयत्न सुरू आहेत असं त्यांनी म्हटलं आहे.
मात्र देवेंद्र फडणवीस यांनी यावर टीका केली आहे. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे जनमताची चोरी झाली तसा प्रकार गोव्यात होऊ देणार नाही असं फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं आहे.
गोव्यात होणार का महाविकास आघाडीचा प्रयोग? संजय राऊत यांनी दिलं उत्तर म्हणाले….
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?