मुंबईकरांचं हे टॉर्चर थांबवा; अभिनेते किशोर कदम यांची सरकार आणि पोलिसांना विनंती

मुंबई तक

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यात मास्क सक्ती करण्यात आलेली आहे. मास्क वापरण्याचं आवाहन राज्य सरकारकडून सातत्यानं केलं जात आहे. मुंबईतही मास्क सक्ती असून, विनामास्क फिरणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात येतो. मात्र, काहीजणांकडून बेकायदेशीरपणे दंड वसूल केला जात असल्याचे प्रकारही समोर आले असून, अभिनेते किशोर कदम यांनी याकडे सरकारचं लक्ष वेधलं आहे. अभिनेते किशोर कदम यांनी फेसबुकवर पोस्ट […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यात मास्क सक्ती करण्यात आलेली आहे. मास्क वापरण्याचं आवाहन राज्य सरकारकडून सातत्यानं केलं जात आहे. मुंबईतही मास्क सक्ती असून, विनामास्क फिरणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात येतो. मात्र, काहीजणांकडून बेकायदेशीरपणे दंड वसूल केला जात असल्याचे प्रकारही समोर आले असून, अभिनेते किशोर कदम यांनी याकडे सरकारचं लक्ष वेधलं आहे.

अभिनेते किशोर कदम यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. ज्यात त्यांनी मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीकडून दंड वसूल करणाऱ्या लोकांबरोबरच गाडी पार्क करण्याबद्दल आक्षेप घेत काही जणांकडून पैसे घेतले जात असल्याचं म्हटलं आहे.

किशोर कदम यांनी काय म्हटलंय?

“अंधेरी पूर्व आणि इतर ठिकाणी राखाडी रंगाचे वा साध्या ड्रेस मधील लोक व काही स्त्रिया प्रायव्हेट गाड्यांमधून वा रस्त्यावरून चाललेल्या कुठल्याही माणसाला धरून तोंडावर मास्क असून, तो नाकाच्या वर नव्हता असं सांगत फोटो काढून पैसे उकळत आहेत. अंधेरी पोलीस आणि शासनाच्या लोकांचे या कडे लक्ष जाईल का?.”

हे वाचलं का?