भीषण अपघात : टँकरच्या धडकेनंतर बसला लागली आग; 12 जणांचा होरपळून मृत्यू

मुंबई तक

राँग साईडने येणाऱ्या टँकरने खासगी बस धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात 12 जणांना आपले प्राण गमवावे लागले. राजस्थानमधील बाडमेर-जोधपूर महामार्गावर ही घटना घडली. प्रशासनातील अधिकारी कर्मचारी वेळीच घटनास्थळी पोहोचल्यानं आगीत अडकलेल्या 10 जणांना वाचवण्यात यश आलं. राजस्थानमधील बाडमेर-जोधपूर महामार्गावर टँकर आणि खासगी बस दुर्घटनाग्रस्त झाली. राँग साईडने येत असलेल्या टँकरने प्रवाशी घेऊन जाणाऱ्या बसला धडक […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राँग साईडने येणाऱ्या टँकरने खासगी बस धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात 12 जणांना आपले प्राण गमवावे लागले. राजस्थानमधील बाडमेर-जोधपूर महामार्गावर ही घटना घडली. प्रशासनातील अधिकारी कर्मचारी वेळीच घटनास्थळी पोहोचल्यानं आगीत अडकलेल्या 10 जणांना वाचवण्यात यश आलं.

राजस्थानमधील बाडमेर-जोधपूर महामार्गावर टँकर आणि खासगी बस दुर्घटनाग्रस्त झाली. राँग साईडने येत असलेल्या टँकरने प्रवाशी घेऊन जाणाऱ्या बसला धडक दिली. या भीषण अपघातानंतर बसने अचानक पेट घेतला. क्षणार्धातच आगीच्या लोळांनी बसला कवेत घेतलं.

धावत्या स्कॉर्पिओने घेतला पेट; बघा गाडीची कशी झाली अवस्था

पेट घेतलेल्या बसमधून 25 प्रवास करत होते. त्यातील 12 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे, तर 10 जणांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलं. आगीने संपूर्ण बस पेटल्यानं महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. तर मदतीकार्यासाठी मोठ्या संख्येनं पोलीस दाखल झाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp