राम कदम म्हणतात दहीहंडी करणारच; केंद्र म्हणतंय ‘राज्य सरकार निर्बंध लावू शकतं’

मुंबई तक

राज्यात सरकारनं दहीहंडी कार्यक्रमांना परवानगी नाकारण्यात आली असली, तर भाजपचे आमदार राम कदम यांच्यासह काही आयोजकांनी दहीहंडी फोडणारच, असा पवित्रा घेतला आहे. यातच आता केंद्र सरकारने राज्य सरकारला दहीहंडी आणि गणेशोत्सवात गर्दी टाळण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्याचा सल्ला दिला आहे. राज्यात अजूनही असलेली कोरोनाची लाट आणि तिसऱ्या लाटेचा धोका… या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यंदाही गणेशोत्सव […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राज्यात सरकारनं दहीहंडी कार्यक्रमांना परवानगी नाकारण्यात आली असली, तर भाजपचे आमदार राम कदम यांच्यासह काही आयोजकांनी दहीहंडी फोडणारच, असा पवित्रा घेतला आहे. यातच आता केंद्र सरकारने राज्य सरकारला दहीहंडी आणि गणेशोत्सवात गर्दी टाळण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्याचा सल्ला दिला आहे.

राज्यात अजूनही असलेली कोरोनाची लाट आणि तिसऱ्या लाटेचा धोका… या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यंदाही गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. तर दहीहंडी कार्यक्रमांनाही परवानगी नाकारण्यात आली आहे. असं असलं तरी भाजपचे आमदार राम कदम यांच्यासह मनसेनं दहीहंडी कार्यक्रम साजरा करण्याची भूमिका घेतली आहे.

राज्यात दहीहंडी आणि गणेशोत्सव साजरा करण्याच्या मागणीसाठी भाजप आक्रमक झालेली असतानाच आता केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्य सरकारला गर्दीला प्रतिबंध घालण्याचा सल्ला दिला आहे. इतकंच नाही, तर गणेशोत्सव आणि दहीहंडी या दोन्ही कार्यक्रमांचा उल्लेख करत या उत्सवांच्या निमित्ताने गर्दी होणार नाही, यासाठी राज्य सरकार स्थानिक पातळीवर आवश्यक निर्बंध लागू करू शकते, असा सल्ला केंद्राने दिला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रात काय म्हटलं आहे?

हे वाचलं का?

    follow whatsapp