नवाब मलिकांचा राजीनामा घ्यायचा नाही या निर्णयावर मुख्यमंत्री ठाम आहेत: अजित पवार
मुंबई: जमीन खरेदी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या मंत्री नवाब मलिक यांचा अद्यापही राजीनामा घेण्यात न आल्याने विरोधी पक्षाने चहापानावर बहिष्कार टाकला. याचविषयी पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा त्यांन स्पष्ट केलं की, अटकेचं कारण योग्य नसल्याने नवाब मलिक यांचा राजीनामा न घेण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ठाम आहेत. पाहा अजित […]
ADVERTISEMENT

मुंबई: जमीन खरेदी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या मंत्री नवाब मलिक यांचा अद्यापही राजीनामा घेण्यात न आल्याने विरोधी पक्षाने चहापानावर बहिष्कार टाकला. याचविषयी पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा त्यांन स्पष्ट केलं की, अटकेचं कारण योग्य नसल्याने नवाब मलिक यांचा राजीनामा न घेण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ठाम आहेत.
पाहा अजित पवार नेमकं काय म्हणाले:
‘नवाब मलिकांचा राजीनामा न घेण्यावर मुख्यमंत्री ठाम’
‘आपल्याला माहिती ना.. की नवाब मलिक यांच्या प्रकरणाची सुनावणी उद्याच आहे. त्यांनी जी अटक करण्यात आली आहे ती योग्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे. हायकोर्टात उद्या सुनावणी आहे. याबद्दल स्वत: राज्याच्या प्रमुखांनी पण सांगितलं इतर मान्यवरांनी पण त्याबाबत स्टेटमेंट केलेलं आहे. सरकारची भूमिका यादेखील सांगण्यात आली आहे.’