कठोर निर्णय घ्यावा लागेल, CMनी बोलवली तातडीची बैठक : अजित पवार

मुंबई तक

मुंबई: अकोला, अमरावती आणि यवतमाळ या तीन शहरात झपाट्याने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आरोग्य खात्याचे सचिव आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना देखील या बैठकीसाठी पाचारण करण्यात आलं आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काही अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय घेण्याची […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

मुंबई: अकोला, अमरावती आणि यवतमाळ या तीन शहरात झपाट्याने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आरोग्य खात्याचे सचिव आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना देखील या बैठकीसाठी पाचारण करण्यात आलं आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काही अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय घेण्याची शक्यता असल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे.

अमरावती, अकोला आणि यवतमाळ या तीन शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचं आढळून आल्याने या तीनही शहरांबाबत प्रशासनाने चिंता व्यक्त केल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी यासंबंधी तातडीची बैठक बोलावली आहे. याच बैठकीला जाण्यापूर्वी अजित पवार यांनी मीडियाशी बोलताना असं म्हटलं आहे की, ‘मुंबईपेक्षा अधिक प्रमाणात या तीनही शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे याबाबत कठोर निर्णय घेतला जाऊ शकतो.’ यामुळे आता या तीनही जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन लागू केला जाणार का? याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

ही बातमी अवश्य पाहा: ‘रुग्ण वाढतायेत, कठोर कारवाई करा’; अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल

पाहा अजित पवार नेमकं काय म्हणाले:

हे वाचलं का?