कार्यकर्त्यांची धरपकड होते आणि हे गॅलरीत ये-जा करतात: अजितदादांनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं
मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा राज्याच्या राजकारणात चर्चेला आणणाऱ्या राज ठाकरेंना राज्याचे उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा डिवचलं आहे. बोलणारे बोलून जातात आणि घरी राहतात. कार्यकर्त्यांची धरपकड होते आणि नेते गॅलरीत ये-जा करतात अशा शब्दांत अजितदादांनी राज ठाकरेंना डिवचलं आहे. मी मागेही सांगितले होतं की, बोलणारे बोलतात आणि आपल्या घरी जातात. आपल्या गॅलरीमधून इकडे-तिकडे बघतात आणि […]
ADVERTISEMENT

मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा राज्याच्या राजकारणात चर्चेला आणणाऱ्या राज ठाकरेंना राज्याचे उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा डिवचलं आहे. बोलणारे बोलून जातात आणि घरी राहतात. कार्यकर्त्यांची धरपकड होते आणि नेते गॅलरीत ये-जा करतात अशा शब्दांत अजितदादांनी राज ठाकरेंना डिवचलं आहे.
मी मागेही सांगितले होतं की, बोलणारे बोलतात आणि आपल्या घरी जातात. आपल्या गॅलरीमधून इकडे-तिकडे बघतात आणि जातात, मात्र, कार्यकर्त्यांना नोटीसा जाऊन त्यांच्यावर केसेस दाखल होतात आणि त्यांची धरपकड होते. त्यामुळे कार्यकर्त्यांनीही ही गोष्ट लक्षात घ्यावी अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
आम्हाला महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था बिघडवू द्यायचा नाही. मग कायदा मोडणारा कुठल्या पक्षाचा, कुणाचा समर्थक, सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाचा असो हे आम्ही हे बघणार नाही. जो सविधानाने दिलेल्या नियमाचे उल्लंघन करत असेल नियम मोडणार असेल तर आम्ही सहन करणार नाही, असंही अजित पवार म्हणाले.
राज ठाकरेंनी आजपर्यंत केलेले एकही आंदोलन यशस्वी झाले नसून त्यामुळे राज्याचे आणि समाजाचे नुकसानच झाल्याची टीका पवारांनी केली आणि राज यांच्या आतापर्यंत आंदोलनाची यादीत वाचून दाखवली.