ठाकरे सरकारमध्ये नैतिकता शिल्लक आहे? अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर फडणवीसांचा प्रश्न
ठाकरे सरकारमध्ये नैतिकता शिल्लक राहिली आहे का? असा प्रश्न विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर विचारला आहे. ज्या प्रकारे राज्यातील पोलिसांचा व्यवहार दिसतो आहे ते पाहूनच उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांचं प्रकरण हे सीबीआयकडे सोपवलं. या संपूर्ण प्रकरणात मी मांडलेली भूमिका कायदेशीर आणि पुराव्यांच्या आधारे मांडत होतो. मला उत्तर […]
ADVERTISEMENT

ठाकरे सरकारमध्ये नैतिकता शिल्लक राहिली आहे का? असा प्रश्न विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर विचारला आहे. ज्या प्रकारे राज्यातील पोलिसांचा व्यवहार दिसतो आहे ते पाहूनच उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांचं प्रकरण हे सीबीआयकडे सोपवलं. या संपूर्ण प्रकरणात मी मांडलेली भूमिका कायदेशीर आणि पुराव्यांच्या आधारे मांडत होतो. मला उत्तर देणारे माझीच चौकशी करू अशा वल्गना करत होते. मला एका गोष्टीचं समाधान आहे की मी जे पुराव्यांनिशी बोलत होतो तेच आज न्यायलायनेही म्हटलं आहे.
शरद पवार यांनी केलेली विनाकारण पाठराखण
शरद पवार यांच्याकडून अनिल देशमुख यांची विनाकारण पाठराखण करण्यात आली. खासकरून दुसऱ्या पत्रकार परिषदेत ते सांगत होते त्यातून हेच दिसून आलं की अनिल देशमुख यांची पाठराखण चुकीच्या पद्धतीने करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसकडे हे खातं होतं आता ते मुख्यमंत्री स्वतःकडे ठेवतील की आणखी कुणाला देतील हे पाहणंही महत्त्वाचं आहे असंही फडणवीस यांनी म्हटलंं आहे.
शरद पवार जेव्हा म्हणतात की आरोप गंभीर आहेत तेव्हा नेमकं काय होतं?










