या व्यवहारानंतर मुंबईत तीन वेळा बॉम्बस्फोट झाले; फडणवीसांचं खळबळजनक विधान

मुंबई तक

–योगेश पांडे, नागपूर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक आणि ईडीची कोठडी सुनावण्यात आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर भूमिका मांडली आहे. ईडीने तपासात आढळून आलेल्या टेरर फंडिंगच्या लिंक्सच्या आधारेच ही कारवाई केली असल्याचं सांगत फडणवीसांनी ईडीच्या कारवाईला योग्य ठरवलं आहे. नागपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी सविस्तर भूमिका मांडली. देवेंद्र फडणवीस काय […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

योगेश पांडे, नागपूर

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक आणि ईडीची कोठडी सुनावण्यात आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर भूमिका मांडली आहे. ईडीने तपासात आढळून आलेल्या टेरर फंडिंगच्या लिंक्सच्या आधारेच ही कारवाई केली असल्याचं सांगत फडणवीसांनी ईडीच्या कारवाईला योग्य ठरवलं आहे. नागपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी सविस्तर भूमिका मांडली.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“एनआयएने मध्यंतरी कारवाया केल्या. या झाडाझडतीमध्ये एनआयएला माहिती मिळाली की, दाऊद ईब्राहिम रिअल इस्टेटच्या माध्यमातून टेरर फंडिग करतोय. रिअल इस्टेटचे व्यवहार मनी लाँडरिंगच्या माध्यमातून होत आहे. यासंदर्भात नऊ ठिकाणी ईडीने सर्च केलं. त्यातून अनेक लिंक्स बाहेर आलेल्या आहेत. यातीलच एक प्रकरण नवाब मलिक यांच्याशी संबंधित आहे.”

हे वाचलं का?

    follow whatsapp