देवेंद्र फडणवीस यांच्या मनातील खंत नकळतपणे आली समोर? पुण्यातल्या वक्तव्याची चर्चा

मुंबई तक

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातल्या कार्यक्रमात केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात हर घर तिरंगा युवा संकल्प अभियनाच्या प्रसंगी उपस्थिती लावली होती. यावेळी विद्यापीठाने केलेल्या रेकॉर्डचं त्यांनी कौतुक केलं. मात्र यावेळी त्यांनी जे वक्तव्य केलं त्यामुळे त्यांच्या मनातली खंत नकळतपणे समोर आली का? ही चर्चा आता सुरू […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातल्या कार्यक्रमात केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात हर घर तिरंगा युवा संकल्प अभियनाच्या प्रसंगी उपस्थिती लावली होती. यावेळी विद्यापीठाने केलेल्या रेकॉर्डचं त्यांनी कौतुक केलं. मात्र यावेळी त्यांनी जे वक्तव्य केलं त्यामुळे त्यांच्या मनातली खंत नकळतपणे समोर आली का? ही चर्चा आता सुरू झाली आहे.

नेमकं पुण्यातल्या कार्यक्रमात काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“पहिला रेकॉर्ड सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केला तेव्हा मला आमंत्रित केलं होतं मी मुख्यमंत्री होतो. आज दुसरा रेकॉर्ड केला आणि मुख्यमंत्री आहे. तिसरा रेकॉर्ड तुम्ही कराल तेव्हा मात्र मी येणार नाही”

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केल्यावर सभागृहात एकच हशा पिकला. मात्र नंतर ही चर्चाही सुरू झाली आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या मनात पुन्हा मुख्यमंत्री न झाल्याची खंत समोर आल्याची चर्चा आहे. २१ जूनला राज्यात जो राजकीय भूकंप झाला तो देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच झाला.

एकनाथ शिंदे शिवसेनेच्या ४० आमदारांना घेऊन बाहेर पडले. आधी सुरतला आणि मग गुवाहाटीला गेले. त्यांनी शिवसेना सोडली नसली तरही त्यांनी जे बंड केलं त्यामुळे शिवसेनेत दोन गट पडले.

हे वाचलं का?

    follow whatsapp