‘शाळेचा वैताग येतो’ सांगितल्यावर शाळाच बंद करणार का? शिक्षणतज्ञांचा केसरकरांना सवाल

मुंबई तक

पुणे : मुलांवरील अभ्यासाचं ओझं कमी करण्यासाठी आगामी शैक्षणिक वर्षापासून पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याच्या विचार सुरू आहे, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी दिली. केसरकर यांच्या या विधानावर आता विविध प्रतिक्रिया येत आहेत. शिक्षणतज्ञांनी यावर ‘शाळेचा वैताग येतो’ सांगितल्यावर शाळा बंद करणार का? असा सवाल मंत्री केसरकरांना विचारला आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पुणे : मुलांवरील अभ्यासाचं ओझं कमी करण्यासाठी आगामी शैक्षणिक वर्षापासून पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याच्या विचार सुरू आहे, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी दिली. केसरकर यांच्या या विधानावर आता विविध प्रतिक्रिया येत आहेत. शिक्षणतज्ञांनी यावर ‘शाळेचा वैताग येतो’ सांगितल्यावर शाळा बंद करणार का? असा सवाल मंत्री केसरकरांना विचारला आहे.

काय म्हणाले शिक्षणतज्ञ?

शिक्षणतज्ञ भाऊसाहेब चासकर यांनी याबाबत फेसबुक पोस्टवरुन सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘गृहपाठ बंद‘ ही पालकांसाठी आनंदाची बातमी खचितच नाही. उलट घरचा अभ्यास देण्यासाठी पालकांचाच आग्रह असतो! काही मुलंदेखील ‘घरचा अभ्यास द्या‘ असे शिक्षकांना म्हणतात आणि आवडीने अभ्यास पूर्ण करून आणतात.

गृहपाठाचा ताण येतो म्हणून दुसरे टोक गाठून एकदम गृहपाठच बंद करणे अजिबात उचित होणार नाही. गृहपाठाचे स्वरूप बदलण्याची गरज आहे. प्रश्नोत्तरे या साच्यातून गृहपाठ बाहेर काढून त्यात रंजकता, नावीन्य आणणे आवश्यक आहे. मुलांना लिहिताना मजा वाटेल, विद्यार्थ्यांच्या शोधक वृत्तीला प्रोत्साहन देता येईल असे गृहपाठ देता येणे शक्य आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp