स्क्रॅप मर्चंट ते कॅबिनेट मंत्री ‘असा’ आहे शरद पवारांच्या लाडक्या नवाब मलिकांचा प्रवास

मुंबई तक

विरोधकांना आपल्या ट्विटने आणि तिखट वाक्यांनी घायाळ करणारे असा लौकिक असलेले नवाब मलिक यांना आज ईडीने अटक केली आहे. आज ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावलं. त्यानंतर आठ तास चौकशी झाल्यावर त्यांना अटक करण्यात आली आहे. स्क्रॅप मर्चंट म्हणून त्यांनी त्याची कारकीर्द सुरू केली होती. ते कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत पोहचले. राष्ट्रवादीचे आक्रमक आणि तिखट भाषा वापरणारे नेते म्हणून […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

विरोधकांना आपल्या ट्विटने आणि तिखट वाक्यांनी घायाळ करणारे असा लौकिक असलेले नवाब मलिक यांना आज ईडीने अटक केली आहे. आज ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावलं. त्यानंतर आठ तास चौकशी झाल्यावर त्यांना अटक करण्यात आली आहे. स्क्रॅप मर्चंट म्हणून त्यांनी त्याची कारकीर्द सुरू केली होती. ते कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत पोहचले. राष्ट्रवादीचे आक्रमक आणि तिखट भाषा वापरणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. सगळ्यात चांगला प्रवक्ता अशी त्यांची ओळख शरद पवारांनी एका पत्रकार परिषदेत करून दिली होती. त्याच नवाब मलिक यांना आता ईडीने अटक केली आहे.

नवाब मलिक यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यात असलेल्या रूसवा या गावात झाला. 20 जून 1959 ला त्यांचा जन्म झाला. मलिक यांचे कुटुंब 1970 मध्ये उत्तर प्रदेशातून मुंबईला स्थलांतरित झाले. आणि पुढे मुंबईतच स्थिरावलं. मागच्या 50 ते 60 वर्षांपासून मलिक कुटुंबाचा स्क्रॅपचा व्यवसाय आहे. नवाब मलिक राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी हा व्यवसाय बघितला. पंधरा ते वीस वर्षापर्यंत त्यांनी मुंबईत स्क्रॅप मर्चंटचा व्यवसाय बघितला. मलिकांचे पहिले दुकान डोंगरी येथे होतं त्यानंतर कुर्ला या भागात स्क्रॅप व्यवसायाला सुरुवात केली. मलिक यांच्यासह त्यांचे सहा भाऊ आहे. मुंबईत दाखल झाल्यानंतर सुरुवातीपासूनच मलिक कुटुंब डोंगरी परिसरात वास्तव्याला होतं.

नवाब मलिक यांच्या शिक्षणाचीही रंजक गोष्ट आहे. प्राथमिक शाळेत असताना त्यांना इंग्रजी माध्यमामध्ये घालण्यात आलं होतं. पण नातेवाईकांच्या विरोधानंतर त्यांना उर्दू शाळेत घालण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परीसरातल्या अंजुमन इस्लाममधून त्यांची बारावी पूर्ण झाली. पण बीएच्या अखेरच्या वर्षी ते परीक्षा देऊ शकले नाहीत. मुंबई विद्यापीठाच्या फीवाढीविरोधात पुकारलेल्या आंदोलनात नवाब मलिक सहभागी झाले. पोलिसांच्या लाठीहल्ल्यात जखमी झाले आणि तिथेच विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून राजकारणाशी जोडले गेले. 1980 मध्ये संजय गांधी यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी मनेका गांधी यांनी संजय विचार मंच नावाने वेगळा गट स्थापन केला. याच गटातून नवाब मलिक यांनी लोकसभा लढवली पण ते पराभूत झाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp