‘…अन् तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली’; मराठा आरक्षण आंदोलकांबद्दल बोलताना तानाजी सावंतांचा तोल सुटला

मुंबई तक

मागच्या काही दिवसांपासून आरोग्यमंत्री तानाजी सावंत सतत वादाच्या भोवऱ्यात अडकत आहेत. ते नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहत आहेत. आता त्यांनी मराठा आरक्षणाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे समाज माध्यमांवर त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. आरक्षण जाऊन दोन वर्ष झाले तेव्हा गप्प राहिले मात्र आता सत्तांतर होताच तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली, असं वादग्रस्त वक्तव्य […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मागच्या काही दिवसांपासून आरोग्यमंत्री तानाजी सावंत सतत वादाच्या भोवऱ्यात अडकत आहेत. ते नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहत आहेत. आता त्यांनी मराठा आरक्षणाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे समाज माध्यमांवर त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. आरक्षण जाऊन दोन वर्ष झाले तेव्हा गप्प राहिले मात्र आता सत्तांतर होताच तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली, असं वादग्रस्त वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं आहे. ते शनिवारी उस्मानाबाद जिल्ह्यातील एका मेळाव्यात बोल्ट होते. सध्या त्यांच्या या विधानाची चर्चा जोरदार सुरु आहे.

काय म्हणाले तानाजी सावंत?

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांना प्रचंड त्रास देण्यात आला. त्यांना ब्राह्मण म्हणून हिणवलं पण त्याच ब्राह्मणानं मराठ्यांची झोळी भरली, असं सावंत म्हणाले. युती सरकार असताना आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चे निघाले. त्याला मुका मोर्चा म्हणून हिणवलं, मराठ्यांचा अपमान केला, आम्ही गप्प राहिलो. पण 2017-2018 मध्ये त्यात देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं. ते टिकलं. दोन बॅच निघाले, त्यांना नोकऱ्या मिळाल्या, असं सावंत म्हणाले.

महाविकास आघाडी सरकार येताच आरक्षण गेलं : तानाजी सावंत

हे वाचलं का?

    follow whatsapp