उद्धव ठाकरेंनी धोका दिला, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे : अमित शाहंचे मोठे वक्तव्य

मुंबई तक

मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2019 च्या निवडणुकानंतर भाजपला धोका दिला. राजकारणात काहीही सहन करा, पण धोका सहन करु नका. उद्धव ठाकरेंना जमीन दाखविण्याची वेळ आली आहे. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असे मोठे वक्तव्य करत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांनी शिवसेनेला इशारा दिला. अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर असुन उपमुख्यमंत्री […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2019 च्या निवडणुकानंतर भाजपला धोका दिला. राजकारणात काहीही सहन करा, पण धोका सहन करु नका. उद्धव ठाकरेंना जमीन दाखविण्याची वेळ आली आहे. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असे मोठे वक्तव्य करत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांनी शिवसेनेला इशारा दिला.

अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर असुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री गिरीश महाजन, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि इतर जवळपास 200 पदाधिकारी उपस्थित होते.

कानाखाली मारली तर ती शरीराला लागते. मात्र आपल्या घरासमोर कानाखाली मारली, तर तिचा आवाज अंर्तमनापर्यंत जाते. आज ती वेळ आली आहे. उद्धव ठाकरेंनी धोका दिला हे बोलण्यात संकोच नको. राजकारणात धोका दिलेल्यांचे राजकारण यशस्वी होत नाही, असेही अमित शाह म्हणाले.

एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना :

याशिवाय शिवसेनेवरही शहा यांनी भाष्य केले. ते म्हणाले, शिवसेना स्वतःच्या निर्णयामुळे छोटी झाली. 2014 मध्ये 2 जागांसाठी युती तोडली. मात्र आता एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना आहे आणि ती आता आपल्यासोबत आहे. असेही शहा म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp