Maharashtra HSC Result 2021: MSBSHSE बारावीच्या निकालाची तारीख जाहीर, पाहा किती वाजता पाहता येणार निकाल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी राज्य मंडळाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. दहावी, अकरावी व बारावीच्या अंतर्गत गुणमापन पध्दतीनुसार यावर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यमापन व मूल्याकंन एका वेगळ्या धर्तीवर केले होते व त्यानुसार गुणांकन करण्यात आले आहे.

अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच इयत्ता 12वीचे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत व तत्सम मूल्यमापनातील प्राप्त गुण या नुसार निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळामार्फत सन 2021 मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत वेबसाइटवर मंगळवार 3 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 4 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा सन 2021साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय देण्यात आलेले गुण खालील वेबसाइटवर उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रिंट घेता येईल.

या वेबसाईटवर पाहता येईल निकाल

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

  • hscresult.mkcl.org

  • mahresult.nic.in

  • www.mahresult.nic.in व https://msbshse.co.in या वेबसाइटवर विदयार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर माहिती देखील उपलब्ध असेल.

    तसेच www.mahahsscboard.in या वेबसाइटवर उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

    बारावीच्या निकालाबाबतचा अन्य तपशील पुढीलप्रमाणे

    सन 2021 मध्ये आयोजित करण्यात आलेली उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आल्यामुळे शासन निर्णयातील मूल्यमापन कार्यपध्दती व तरतुदीनुसार व इयत्ता 10वी मधील मंडळाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी गुण.

    याशिवाय इयत्ता 11वीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण व इयत्ता 12वीच्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच इयत्ता 12वीचे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत व तत्सम मूल्यमापनातील प्राप्त गुण इत्यादींच्या आधारे इयत्ता 12वी साठी भारांशानुसार उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात आले आहे.

    सदर गुणदान विचारात घेवून मंडळाने कार्यपध्दतीनुसार बारावीच्या परीक्षेचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया केलेली आहे.

    Maharashtra HSC Result 2021:’MSBSHSE’: बारावीच्या निकालाविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी नक्की जाणून घ्या

    2 जुलै 2021 रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार सन 2021 मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावीच्या परीक्षेस श्रेणीसुधार योजनेतंर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही. विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधीमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील एक/दोन संधी उपलब्ध राहतील.

      follow whatsapp

      ADVERTISEMENT