IMD कडून रेड अलर्ट! राज्यात १३ एनडीआरएफ, तर २ एसडीआरएफच्या तुकड्या तैनात

मुंबई तक

महाराष्ट्रभर मान्सून व्यापला असून, गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. पुढील दोन पावसाचा जोर कायम राहणार असून, आज दिवसभरात सहा जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशाऱ्या हवामान विभागाकडून देण्यात आलाय. ठाण्यातील मुंब्रा परिसरात भूस्खलन होऊन भिंत कोसळली ठाण्यातील मुंब्रा परिसरातील ठाकूरपाडा पारसिक बोगदा या ठिकाणी आनंद सोसायटीची संरक्षण भिंत पडली. संरक्षण भिंत […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्रभर मान्सून व्यापला असून, गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. पुढील दोन पावसाचा जोर कायम राहणार असून, आज दिवसभरात सहा जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशाऱ्या हवामान विभागाकडून देण्यात आलाय.

ठाण्यातील मुंब्रा परिसरात भूस्खलन होऊन भिंत कोसळली

ठाण्यातील मुंब्रा परिसरातील ठाकूरपाडा पारसिक बोगदा या ठिकाणी आनंद सोसायटीची संरक्षण भिंत पडली. संरक्षण भिंत १२ फुट लांब व ८ फुट उंचीची होती. संततधार पडत असलेल्या पावसामुळे ही भिंत असलेल्या जमिनीचा काही भाग खचला आणि त्यामुळे भिंत पडली. ही संरक्षण भिंत पडल्यामुळे सुदैवाने कुठलीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक आयुक्त (मुंब्रा प्रभाग समिती), कनिष्ठ अभियंता (सार्वजनिक बांधकाम विभाग), अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी १- रेस्क्यु वाहनासह घटनास्थळी उपस्थित राहून मलबा हटवण्याचे काम करत आहे.

राज्यात १३ एनडीआरएफ, तर २ एसडीआरएफच्या तुकड्या तैनात

हे वाचलं का?

    follow whatsapp