LockDown New Rules : कठोर निर्बंधांविषयी तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं

मुंबई तक

महाराष्ट्रात आजपासून आणखी कठोर निर्बंध लागू झाले आहेत. कोरोना रूग्णांची संख्या कमी होत नसल्याने बुधवारी रात्रीच यासंदर्भातलं पत्रक काढण्यात आलं होतं. निर्बंध आणखी कठोर करण्यात आल्याचं त्यात नमूद करण्यात आलं होतं. जसं की जिल्हाबंदीचा निर्णय असेल किंवा लग्नाला 25 पेक्षा जास्त माणसं जमली असतील तर आणि दोन तासांमध्ये लग्न उरकलं नाही तर 50 हजारांचा दंड […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्रात आजपासून आणखी कठोर निर्बंध लागू झाले आहेत. कोरोना रूग्णांची संख्या कमी होत नसल्याने बुधवारी रात्रीच यासंदर्भातलं पत्रक काढण्यात आलं होतं. निर्बंध आणखी कठोर करण्यात आल्याचं त्यात नमूद करण्यात आलं होतं. जसं की जिल्हाबंदीचा निर्णय असेल किंवा लग्नाला 25 पेक्षा जास्त माणसं जमली असतील तर आणि दोन तासांमध्ये लग्न उरकलं नाही तर 50 हजारांचा दंड होईल असे अनेक निर्बंध लागू करण्यात आले. तरीही निर्बंध कठोर झाले म्हणजे नेमकं काय झालं? प्रवास करता येईल की नाही? प्रवास कुणाला करता येईल? बाहेर पडलं तर काय होईल? असे अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात आहेत. अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आता सरकारने दिली आहेत.

डॉक्टर्स आणि वैद्यकीय सेवा पुरवणारे लोक हे जिल्हा अंतर्गत प्रवास करू शकतात की त्यावर काही निर्बंध असतील?

उत्तर- होय डॉक्टर्स आणि वैद्यकीय सेवा पुरवणारे लोक यांना जिल्हाबंदी नाही. ते एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात खासगी, सार्वजनिक किंवा स्वतःच्या वाहनाने प्रवास रू शकतात. त्यांच्याजवळ त्यांचं ओळखपत्र असणं आवश्यक आहे. तसंच या सगळ्यांनी प्रवास करण्याचं आरोग्यविषयक कारण त्यांच्याकडे असलं पाहिजे.

हे वाचलं का?

    follow whatsapp