'फडणवीस साहेब तेव्हा साफ खोटं बोलले...', गुवाहटीच्या 'त्या' फोनबाबत बच्चू कडूंचा खळबजनक खुलासा

मुंबई तक

एकनाथ शिंदेंसोबत गुवाहटीला जाण्यासाठी मला फडणवीसांनी फोन केला नव्हता. ते याबाबत साफ खोटं बोलले आहेत. असा दावा माजी मंत्री बच्चू कडू यांनी केला आहे. पाहा ते नेमकं काय म्हणाले.

ADVERTISEMENT

devendra fadnavis saheb lied then bachchu kadu sensational revelation about that guwahati phone call on mumbai tak chavadi
बच्चू कडूंचा खळबजनक खुलासा
social share
google news

मुंबई: शेतकरी आंदोलनातून सरकारला कर्जमाफीसाठी धारेवर धरणारे नेते बच्चू कडू यांनी मुंबई Tak चावडीवर एक अत्यंत खळबळजनक खुलासा केला आहे. गुवाहटीला जाण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: बच्चू कडूंना फोन केला होता असं खुद्द फडणवीस म्हणाले होते. पण याचबाबत चावडीवर प्रश्न विचारण्यात आला तेव्हा बच्चू कडू थेट असं म्हणाले की, 'फडणवीस साहेब तेव्हा साफ खोटं बोलले...'  

पाहा बच्चू कडू नेमकं काय म्हणाले...

प्रश्न: देवेंद्र फडणवीसांनी मागे सांगितलं होतं की, 'माझ्या एका फोनवर बच्चू कडू हे गुवाहटीला गेले होते. ते एकमेव असे आमदार होते की, ज्यांना मी फोन केला होता.' यावेळी बच्चू कडूंनी त्यांचं सर्वस्व पणाला लावलं. जे त्यांच्याकडे मंत्रिपद होतं ते सोडून ते तिकडे गेले. ते मंत्रिपद त्यांना मिळालं देखील नाही हा भाग वेगळा. 

फडणवीस हे तेव्हा मुख्यमंत्री देखील नव्हते. पण तरीही त्यांच्या एका फोनवर तुम्ही तुमचं सर्वस्व पणाला लावून गुवाहटीला गेलात. तर तशाच पद्धतीने तुम्ही एक फोन फडणवीसांना लावून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले का? किंवा तसं काही करण्याचा प्रयत्न केला का? जेणेकरून तुम्हाला आंदोलन करण्याची गरजच भासली नसती.

हे ही वाचा>> 'आम्ही तारीख घ्यायला आलो होतो आणि आम्हाला..', बच्चू कडूंना CM फडणवीसांनी दिला 'तो' शब्द!

बच्चू कडू: पुन्हा गफलत आहे.. तुम्ही फोन लावायचं म्हणता आहात. पण मी 8 दिवस अन्नत्याग केलं आहे. ते तुम्हाला महत्त्वाचं वाटत नाही आणि तुम्ही फोन लावायचं म्हणत आहात. अहो किती कठीण काम आहे.. 

हे वाचलं का?

    follow whatsapp