नेमका काय आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद?

मुंबई तक

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद -संघर्ष आणि संकल्प हे मी संपादित केलेलं पुस्तक २७ जानेवारी २०२१ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशित झालं. या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे होते . हे पुस्तक म्हणजे १९५६ पासून आजतागायत महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाच्या बाबतीत महाराष्ट्राच्या विधिमंडळात झालेली […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद -संघर्ष आणि संकल्प हे मी संपादित केलेलं पुस्तक २७ जानेवारी २०२१ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशित झालं. या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे होते . हे पुस्तक म्हणजे १९५६ पासून आजतागायत महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाच्या बाबतीत महाराष्ट्राच्या विधिमंडळात झालेली भाषणे, महाराष्ट्राच्या राजकीय नेत्यांनी वेगवेगळ्या व्यासपीठांवर व्यक्त केलेली मनोगते, महाजन आयोगाच्या अहवालाचा परामर्श घेणारी घेणारे लेख अशा अनेक बाबींचा समावेश या पुस्तकात आहे. एवढेच नव्हे तर सीमा लढ्याची नव्या पिढीला ओळख व्हावी म्हणून महत्त्वाची छायाचित्रे या पुस्तकात देण्यात आली आहेत. महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी भारत सरकारला आणि कर्नाटक सरकारला या प्रश्नावर जी काही पत्रे लिहिली त्याचा समग्र आढावा या पुस्तकात आहे. महाराष्ट्र शासनाच्या सीमा कक्षाच्या वतीने गेल्या पंचवीस वर्षांमध्ये सीमा भागातील जनतेसाठी जे वेगवेगळे निर्णय घेतले गेले त्याचा सविस्तर मागोवा आणि शासन निर्णय यांचा तपशील या पुस्तकात आहे

हे सगळं शासनाचा महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचा विशेष कार्य अधिकारी म्हणून मला मांडता आलं याचं श्रेय ज्यांच्या नेतृत्वाखाली सीमा कक्षाने काम केलं ते प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे यांना आहे तसंच सीमा प्रश्नाचे समन्वयक मंत्री माननीय छगन भुजबळ आणि माननीय एकनाथ शिंदे यांनाही आहे अशा प्रकारचे पुस्तक या लढ्याला सहा दशके पूर्ण झाल्यानंतर प्रसिद्ध करण्याचे औचित्य काय असा प्रश्न कागींच्या मनामध्ये येऊ शकेल. त्यावरचं माझे उत्तर असे आहे हे काम या आधीच व्हायला होतं. महाराष्ट्रात व्हायला हवं होतं, सीमाभागात व्हायला हवं होतं. उशीरा का होईना या प्रकारचं काम करण्याची संधी मला मिळाली याबद्दल याबद्दल सर्व संबंधितांच्या बद्दल माझ्या मनात कृतज्ञतेची भावना आहे. हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतरच्या महिन्याभरात बेळगाव मध्ये कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बराच धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला.

हे वाचलं का?

    follow whatsapp