Maharashtra Political Crisis : “ठाकरेंनी राजीनामा देऊन राज्यपालांचा निर्णय योग्य ठरवला”

मुंबई तक

Maharashtra Supreme Court Hearing Today: महाराष्ट्रातील सत्तांतरांमध्ये राज्यपालांची भूमिका महत्त्वाची ठरली. राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयावर ठाकरे गटाकडून अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. त्यानंतर आज राज्यपालांच्या वतीने युक्तिवाद करताना सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी काही मुद्दे मांडले. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याकडेही त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचं लक्ष वेधलं. (supreme court hearing on Maharashtra today, Uddhav Thackeray Vs Eknath Shinde) […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Maharashtra Supreme Court Hearing Today: महाराष्ट्रातील सत्तांतरांमध्ये राज्यपालांची भूमिका महत्त्वाची ठरली. राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयावर ठाकरे गटाकडून अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. त्यानंतर आज राज्यपालांच्या वतीने युक्तिवाद करताना सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी काही मुद्दे मांडले. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याकडेही त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचं लक्ष वेधलं. (supreme court hearing on Maharashtra today, Uddhav Thackeray Vs Eknath Shinde)

राज्यपालांच्या वतीने युक्तिवाद करताना सॉलिसीटर जनरल तुषार मेहता म्हणाले, “बहुमत सिद्ध करायला सांगण्याआधी राज्यपालांनी त्यांच्याकडे आलेल्या गोष्टी बघितल्या. आमदारांचा एक गटाने सांगितलं की त्यांचा या सरकारवर विश्वास राहिलेला नाही. मग पुरेशा बाबी समोर असताना राज्यपालांनी बहुमत चाचणीला सामोर जायला सांगितलं यात चुकीचं काय? या सर्व बाबी सार्वजनिक आहेत. सर्व माध्यमांनी हे दाखवलं. अशा परिस्थितीत राज्यपाल मूकदर्शक म्हणून शांत बसू शकत नाही. त्यांनी तशी कृती केली”, असं सांगत मेहता यांनी बोम्मई निकालाचा दाखला दिला.

पुढे बोलताना मेहता म्हणाले, “सरकारने बहुमत गमावल्याच्या ज्या बाबींच्या आधारे राज्यपालांनी निर्णय घेतला, तो निर्णय उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन योग्य असल्याचं ठरवलं. हा त्यांचा अधिकार नाही, मात्र बहुमत सिद्ध करायला सांगणं राज्यपालांचं उत्तरदायित्व आहे”, असं सांगत मेहता यांनी शिवराज सिंह चौहान निकालाचा दाखला दिला.

Shiv Sena: ठाकरेंना झटका, शिवसेना शिंदेंचीच! आयोगाची सुप्रीम कोर्टात भूमिका

हे वाचलं का?

    follow whatsapp