एकनाथ शिंदे गट विरुद्ध शिवसेनेतील सर्वोच्च न्यायालयातील लढाई लांबणार?, आज काय घडणार?
४० आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत सत्ता स्थापन करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा काय निकाल येईल याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं असताना हे प्रकरण सुनावणीसाठी घेण्यात आलेलं नाही. त्यामुळे शिंदे गट विरुद्ध शिवसेना यांच्यातील कायद्याची लढाई लांबण्याची चिन्हं दिसत आहेत. बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेनं बैठकीला हजर न […]
ADVERTISEMENT

४० आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत सत्ता स्थापन करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा काय निकाल येईल याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं असताना हे प्रकरण सुनावणीसाठी घेण्यात आलेलं नाही. त्यामुळे शिंदे गट विरुद्ध शिवसेना यांच्यातील कायद्याची लढाई लांबण्याची चिन्हं दिसत आहेत.
बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेनं बैठकीला हजर न राहिल्याप्रकरणी १६ आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली होती. झिरवळ यांनी नोटीस बजावल्यानंतर आमदारांनी त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.
सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी २७ जून रोजी सुटीकालीन खंठपीठासमोर सुनावणी झाली होती. यावेळी झालेल्या युक्तिवादावेळी उपाध्यक्षांविरोधात आलेल्या अविश्वास प्रस्तावाचा हवाला देत शिंदे गटाने उपाध्यक्षांना कारवाईचा अधिकार नसल्याचं म्हटलं होतं. दुसरीकडे १६ आमदारांना मतदानात सहभागी होण्यापासून रोखावं अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीसाठी ११ जुलै ही तारीख निश्चित केली होती.
shiv sena crisis : शिंदे सरकारला मोठा दिलासा; सर्वोच्च न्यायालयात नेमकं घडलं?