एकनाथ शिंदेंच्या साताऱ्यातच पडणार खिंडार? महेश शिंदे म्हणाले, ‘जेवत्या ताटावरून उठवलं गेलं, ते…’
-इम्तियाज मुजावर, सातारा राज्याच्या राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही, असं विधान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी गेल्या आठवड्यात केलं होतं. त्यामुळे सरकारच्या अस्थिरतेबद्दलच्या चर्चा सुरू झाल्या. त्यात आता एकनाथ शिंदेंच्या जिल्ह्यातच शिंदे गटातील दोन आमदारांमधील धुसफूस समोर आलीये. आमदार महेश शिंदे यांनी बोलता बोलता बरीच खदखद व्यक्त केल्यानं साताऱ्यातून शिंदेंला खिंडार पडू शकते, अशी […]
ADVERTISEMENT

-इम्तियाज मुजावर, सातारा
राज्याच्या राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही, असं विधान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी गेल्या आठवड्यात केलं होतं. त्यामुळे सरकारच्या अस्थिरतेबद्दलच्या चर्चा सुरू झाल्या. त्यात आता एकनाथ शिंदेंच्या जिल्ह्यातच शिंदे गटातील दोन आमदारांमधील धुसफूस समोर आलीये. आमदार महेश शिंदे यांनी बोलता बोलता बरीच खदखद व्यक्त केल्यानं साताऱ्यातून शिंदेंला खिंडार पडू शकते, अशी चर्चा जिल्ह्यात सुरू झालीये.
उद्धव ठाकरेंना आव्हान देत एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि भाजपच्या साथीनं सरकारही स्थापन केलं. सरकार स्थापनेला 100 दिवस झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी समर्थक आमदारांसह गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचे आशीर्वाद घेतले. आता आम्ही सत्तेतून हटत नाही, असा नारा सत्तेतील आमदार देत असतानाच सातारा जिल्ह्यातून शिंदे गटातल्या नाराजीचीच बातमी आलीये.
कोरेगावचे आमदार महेश शिंदे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्यावर नाराज असल्याची चर्चा गेल्या महिनाभरापासून साताऱ्यात सुरुये. याचं कारण सांगितलं जातंय महेश शिंदे यांना पालकमंत्री शंभुराज देसाई हवी तेवढी ताकद देत नसल्याचं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या साताऱ्यातच शिंदे गटात नाराजीचा स्फोट होऊन गटाला गळती लागू शकते, अशा शक्यता जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात जाणकारांकडून व्यक्त केली जाऊ लागलीये.