महाराष्ट्र लॉकडाऊनच्या दिशेने, लग्न-कार्यक्रमांसाठी फक्त 50 जणांनाच परवानगी; पाहा काय आहेत नवे निर्बंध

मुंबई तक

मुंबई: कोरोनाचा (Corona) नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनने (Omaicron ) आता अधिक चिंता वाढवली आहे. कारण राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या वाटेवर असल्याचं अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने तात्काळ कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मुंबईत […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

मुंबई: कोरोनाचा (Corona) नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनने (Omaicron ) आता अधिक चिंता वाढवली आहे. कारण राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या वाटेवर असल्याचं अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने तात्काळ कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निर्बंध घालण्यात आल्यानंतर आता संपूर्ण राज्यात कडक निर्बंध (New Guidelines for Maharashtra) लागू करण्यात आले आहेत. राज्यात कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी जमावबंदी लागू केली गेली आहे. याशिवाय लग्न सोहळे आणि इतर कार्यक्रम फक्त 50 लोकांच्या उपस्थितीत करण्यासच परवानगी देण्यात आली आहे.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात कोरोना पॉझिटिव्ह, संपर्कात आलेल्यांना केलं काळजी घेण्याचं आवाहन

पाहा नव्या नियमावलीत नेमकं काय आहे:

हे वाचलं का?