महाराष्ट्रात Corona रुग्णसंख्येचा आलेख वाढताच, ३९ हजारांपेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह

मुंबई तक

महाराष्ट्रात दिवसभरात ३९ हजार ५४४ नव्या रूग्णांचं निदान झालं आहे. कोरोना रूग्णांच्या संख्येचा आलेख हा गेल्या काही दिवसांपासून चढताच आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू शकतो अशी स्थिती आहे. दिवसभरात २३ हजार ६०० रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण २४ लाख ७२७ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण हे फेब्रुवारी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

महाराष्ट्रात दिवसभरात ३९ हजार ५४४ नव्या रूग्णांचं निदान झालं आहे. कोरोना रूग्णांच्या संख्येचा आलेख हा गेल्या काही दिवसांपासून चढताच आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू शकतो अशी स्थिती आहे. दिवसभरात २३ हजार ६०० रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण २४ लाख ७२७ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण हे फेब्रुवारी महिन्याआधी ९१ किंवा ९२ टक्क्यांवर होते जे आता ८५.३४ टक्के इतके झाले आहे. राज्यात दिवसभरात २२७ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर हा सध्या १.९४ टक्के इतका झाला आहे.

मुंबईत लॉकडाऊन होणार का? BMC आयुक्त चहल यांची Exclusive मुलाखत

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ९७ लाख ९२ हजार १४३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २८ लाख १२ हजार ९८० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १७ लाख २९ हजार ८१६ व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर १७ हजार ८६३ जण होम क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला ३ लाख ५६ हजार २४३ रूग्ण आहेत. आज राज्यात ३९ हजार ५४४ नवीन रूग्णांची नोंद झाली आता राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या ही २८ लाख १२ हजार ९८० झाली आहे.

लॉकडाऊन लागला तरी 10-12वीच्या परीक्षा होणारच!

हे वाचलं का?