Omicron ला रोखण्यासाठी भारतात पुन्हा लॉकडाऊनची गरज? पाहा तज्ज्ञांचं म्हणणं काय
मुंबई: कोरोना व्हायरसचा (Coronavirus) नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron) यामुळे लोकांची चिंता पुन्हा एकदा वाढू लागली आहे. नवीन व्हेरिएंटचा वेग आधीच्या डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत तीनपट जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत व्हायरसच्या वेगाला ब्रेक लावण्यासाठी लॉकडाऊन (Lockdown) हा एकमेव मार्ग आहे का? की सरकारने तिसऱ्या डोसचाही म्हणजे बूस्टर डोसचाही विचार करायला सुरुवात करावी? या आणि […]
ADVERTISEMENT

मुंबई: कोरोना व्हायरसचा (Coronavirus) नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron) यामुळे लोकांची चिंता पुन्हा एकदा वाढू लागली आहे. नवीन व्हेरिएंटचा वेग आधीच्या डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत तीनपट जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत व्हायरसच्या वेगाला ब्रेक लावण्यासाठी लॉकडाऊन (Lockdown) हा एकमेव मार्ग आहे का? की सरकारने तिसऱ्या डोसचाही म्हणजे बूस्टर डोसचाही विचार करायला सुरुवात करावी? या आणि अशा अनेक प्रश्नांची तज्ज्ञांनी उत्तरं दिली आहेत. जाणून घेऊयात याविषयी सविस्तरपणे.
संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत लहरिया म्हणतात की, कोणत्याही व्हेरिएंटविरुद्ध लस ही निश्चितपणे संरक्षण प्रदान करते. म्हणजेच, लसीकरण केलेली व्यक्ती लसीकरण न केलेल्या व्यक्तीपेक्षा सुरक्षित असते. परंतु संपूर्ण सुरक्षिततेसाठी दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. ज्यांनी फक्त एकच डोस घेतला आहे, त्यांना शक्य तितक्या लवकर दुसरा डोस घ्यावा. देशात अजूनही 15 टक्के प्रौढ आहेत ज्यांनी कोणताही डोस घेतलेला नाही. अशा परिस्थितीत लोकांमध्ये लसीबाबत जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे.
बूस्टर डोस म्हणजेच तिसऱ्या डोसबाबत डॉ. लहरिया म्हणाले की, सर्वप्रथम देशातील लसीकरण न झालेल्या लोकसंख्येला एक डोस देण्याची गरज आहे. शास्त्रज्ञ आणि तांत्रिक तज्ज्ञ उर्वरित बूस्टर डोसबद्दल आपलं मत व्यक्त करत आहेत.
लॉकडाऊन करणं गरजेचं आहे?