कोणताही प्रश्न आला तरीही महाराष्ट्राच्या मागे उभे राहणारे नेते म्हणजे नितीन गडकरी-शरद पवार

मुंबई तक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचं कौतुक केलं आहे. पुण्यातल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या वतीने साखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात शरद पवार आणि नितीन गडकरी Nitin Gadkari एकाच मंचावर होते. यावेळी शरद पवांनी नितीन गडकरी यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. काय म्हणाले आहेत शरद पवार? […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचं कौतुक केलं आहे. पुण्यातल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या वतीने साखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात शरद पवार आणि नितीन गडकरी Nitin Gadkari एकाच मंचावर होते. यावेळी शरद पवांनी नितीन गडकरी यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

काय म्हणाले आहेत शरद पवार?

साखर कारखानदारीसाठी राज्य सरकारची मदत हवी असते, आत्ताच्या राज्य सरकारमध्ये उसाबद्दल, कारखानदारीबद्दल जाण असलेले अनेक सहकारी आहेत. त्यामुळे त्यांची मदत होईल. आज केंद्र सरकारमध्ये महाराष्ट्रातील उसाचा, साखरेचा, इथेनॉलचा किंवा कोणताही प्रश्न आला तर त्यांच्या मागे एक व्यक्त भक्कमपणे उभी असते ती व्यक्ती म्हणजे नितीन गडकरी. ते आज या साखर परिषदेत आले आहेत याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

सर्वांच्या प्रयत्नाने आपण साखर उद्योगात यश मिळवलं, साखर उद्योगात आता महाराष्ट्र क्रमांक एकवर गेला आहे. या क्षेत्रात प्रगती झाली याचा आम्हाला आनंद आहे मात्र आता पुढील दिशा शोधण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp