‘सरकार वेळेवर निर्णय घेत नाही, हाच प्रॉब्लेम’; नितीन गडकरींनी मोदी सरकारचे टोचले कान?
भाजपच्या संसदीय समितीतून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना वगळण्यात आलं. गडकरींना बाजूला करण्यावरून वेगवेगळ्या कारणांची चर्चा होत असतानाच रविवारी गडकरी त्यांच्या भाषणामुळे पुन्हा चर्चेचा विषय ठरले. ‘NATCON 2022’च्या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींनी एक विधान केलं. त्यावरून गडकरींनी अप्रत्यक्षपणे मोदी सरकारचेच कान टोचल्याचं बोललं जातंय. असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्सच्या वतीने ‘NATCON 2022’चं आयोजन […]
ADVERTISEMENT

भाजपच्या संसदीय समितीतून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना वगळण्यात आलं. गडकरींना बाजूला करण्यावरून वेगवेगळ्या कारणांची चर्चा होत असतानाच रविवारी गडकरी त्यांच्या भाषणामुळे पुन्हा चर्चेचा विषय ठरले. ‘NATCON 2022’च्या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींनी एक विधान केलं. त्यावरून गडकरींनी अप्रत्यक्षपणे मोदी सरकारचेच कान टोचल्याचं बोललं जातंय.
असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्सच्या वतीने ‘NATCON 2022’चं आयोजन करण्यात आलं होतं. याच कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरींनी मोदी सरकारला घरचा आहेर दिलाय.
नितीन गडकरी सरकारच्या भूमिकेवर काय म्हणाले?
‘NATCON 2022’च्या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले, “बांधकाम क्षेत्रात वेळेला खूप महत्त्व आहे आणि वेळ हीच आपली खरी संपत्ती आहे. पण, सरकारची सर्वात मोठी समस्या आहे, ती म्हणजे सरकार वेळेवर निर्णय घेत नाही.”
नितीन गडकरी पुढे बोलताना म्हणाले, “भारतात बांधकाम क्षेत्राचं भविष्य चांगलं आहे. त्यासाठी आपल्याला जगातील नवं तंत्रज्ञान आत्मसात करावं लागेल. आपल्याकडे बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या मालाला सुद्धा पर्याय शोधावे लागतील. जेणेकरून प्रकल्पाच्या गुणवत्तेशी तडजोड न करता, किंमत कमी करत येईल”, असं नितीन गडकरींनी कार्यक्रमात बोलताना सांगितलं.