अशा पद्धतीने घेता येतील दहावीच्या परीक्षा ! याचिकाकर्ते धनंजय कुलकर्णींकडून वर्षा गायकवाडांना निवेदन

मुंबई तक

राज्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाचं कारण देत राज्य सरकारने दहावीची परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात पुण्याचे प्राध्यापक धनंजय कुलकर्णी यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. धनंजय कुलकर्णी यांनी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना एक निवेदन करुन दहावीच्या परीक्षा कशा घेता येतील याबद्दलची मांडणी केली आहे. देव या राज्याच्या शिक्षणव्यवस्थेचं भलं करो, दहावीची […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

राज्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाचं कारण देत राज्य सरकारने दहावीची परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात पुण्याचे प्राध्यापक धनंजय कुलकर्णी यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. धनंजय कुलकर्णी यांनी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना एक निवेदन करुन दहावीच्या परीक्षा कशा घेता येतील याबद्दलची मांडणी केली आहे.

देव या राज्याच्या शिक्षणव्यवस्थेचं भलं करो, दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर हायकोर्टाचे ताशेरे

विद्यार्थ्यांना आपल्याच शाळेत सेंटर, दोन गटांमध्ये विभागणी, दोन प्रश्नपत्रिका, कोरोना चाचणी, मास्क घालणं बंधनकारक, परीक्षा केंद्रात पालकांना प्रवेश नाही, शाळेतल्या शिक्षकांकडून पेपर तपासणी असे पर्याय धनंजय कुलकर्णी यांनी आपल्या निवेदनात सादर केले आहेत. जाणून घेऊयात काय आहेत हे पर्याय…

१) दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांची शाळा केंद्र म्हणून देण्यात यावी.

हे वाचलं का?