37 वर्षांनी मिळाला न्याय, 50 रुपयांची लाच घेतल्याचा आरोप; दिवंगत टीसीला सर्वोच्च न्यायालयाने ठरवले निर्दोष

मुंबई तक

Supreme Court : 37 वर्षांनी मिळाला न्याय, 50 रुपयांची लाच घेतल्याचा आरोप; दिवंगत टीसीला सर्वोच्च न्यायालयाने ठरवले निर्दोष

ADVERTISEMENT

Supreme Court
Supreme Court
social share
google news

बातम्या हायलाइट

point

37 वर्षांनी मिळाला न्याय, 50 रुपयांची लाच घेतल्याचा आरोप

point

दिवंगत टीसीला सर्वोच्च न्यायालयाने ठरवले निर्दोष

नवी दिल्ली : होय, अखेर 37 वर्षानंतर न्याय मिळालाय. सर्वोच्च न्यायालयाने एका ऐतिहासिक निर्णयात 50 रुपयांची लाच घेतल्याचा आरोप असलेल्या रेल्वे तिकीट तपासकाला (TTE) निर्दोष ठरवलं आहे. हा निकाल देताना न्यायालयाने म्हटलं, “न्याय मिळण्यास उशीर होऊ शकतो, पण सत्य कधीही पराभूत होत नाही.” या निर्णयामुळे दिवंगत अधिकारी वी. एम. सौदागर यांच्या कुटुंबाला दिलासा मिळाला असून, त्यांना तीन महिन्यांच्या आत निवृत्तीवेतन आणि इतर सर्व थकबाकी सेवा लाभ देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

1988 मधील आरोप, 1996 मध्ये बडतर्फ

मे 1988 मध्ये दादर–नागपूर एक्सप्रेसमध्ये ड्युटीवर असताना TTE वी. एम. सौदागर यांच्यावर रेल्वे सतर्कता विभागाने आरोप केला की, त्यांनी तीन प्रवाशांकडून सीट वाटपासाठी 50 रुपयांची लाच मागितली. या आरोपानंतर विभागीय चौकशी सुरू झाली आणि 1996 मध्ये त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं. यामुळे एका प्रामाणिक अधिकाऱ्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं.

CAT पासून सुप्रीम कोर्टापर्यंतचा प्रवास

बडतर्फीनंतर सौदागर यांनी आपला मुद्दा केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणात (CAT) मांडला. 2002 मध्ये ट्रिब्यूनलने निर्णय दिला की, आरोप सिद्ध करणारे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत आणि सौदागर यांना सेवेत पुन्हा बहाल करण्यात यावं. मात्र, रेल्वे प्रशासनाने या निर्णयाला बॉम्बे हायकोर्टात आव्हान दिलं. प्रकरण वर्षानुवर्षं न्यायालयात अडकून राहिलं आणि दरम्यान सौदागर यांचं निधन झालं. तरीही त्यांच्या कुटुंबाने हार न मानता सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला.

"पुरावे नसतील, तर गुन्हाही नाही" - सर्वोच्च न्यायालय

हे वाचलं का?

    follow whatsapp