राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’मुळे महाराष्ट्राच्या राजकारणात ५ बदल झालेत!

मुंबई तक

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा 14 दिवस महाराष्ट्रात होती. भारत जोडण्यासाठी आपण यात्रेवर निघालोय, असं राहुल गांधी सांगत असले, तरी यात्रेचा एक मूळ उद्देश काँग्रेससाठी वातावरणनिर्मिती करणं हाही असल्याचं वेळोवेळी समोर आलंय. महाराष्ट्रात तर आपल्याला आतापर्यंत ज्या राज्यांत गेलीय, तिथल्यापेक्षा अधिक प्रतिसाद मिळाल्याचा दावा राहुल गांधींना पत्रकार परिषदेत केला. महाराष्ट्राच्या राजकीय चर्चाविश्वात या यात्रेबद्दल सध्या […]

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा 14 दिवस महाराष्ट्रात होती. भारत जोडण्यासाठी आपण यात्रेवर निघालोय, असं राहुल गांधी सांगत असले, तरी यात्रेचा एक मूळ उद्देश काँग्रेससाठी वातावरणनिर्मिती करणं हाही असल्याचं वेळोवेळी समोर आलंय. महाराष्ट्रात तर आपल्याला आतापर्यंत ज्या राज्यांत गेलीय, तिथल्यापेक्षा अधिक प्रतिसाद मिळाल्याचा दावा राहुल गांधींना पत्रकार परिषदेत केला. महाराष्ट्राच्या राजकीय चर्चाविश्वात या यात्रेबद्दल सध्या मोठ्या प्रमाणात बोललं जातंय. पण या यात्रेनं काय साधलं? याचा खरंच काँग्रेसला फायदा होणार का? आणि भाजपसाठी काळजी करण्यासारखी काही गोष्ट आहे का? हेच आपण ५ मुद्द्यांतून समजून घेणार आहोत.

राहुल गांधींनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतची भारत जोडो यात्रा सुरू केलीये. महाराष्ट्रात 384 किलोमीटरचा प्रवास करून ही यात्रा मध्य प्रदेशकडे रवाना झाली. नांदेड, हिंगोली, अकोला, वाशिम आणि बुलडाणा या पाच जिल्ह्यांतून ही यात्रा गेली. या यात्रेनं महाराष्ट्राच्या राजकारणात काय साधलं, हे आपण पाच गोष्टींतून बघणार आहोत.

पहिली गोष्ट आहे. भाजपविरोधक तसंच काँग्रेसचे कार्यकर्ते, समर्थक व्होकल झालेत. भारत जोडोनं सगळ्यात मोठी कुठली गोष्ट झाली, तर ती काँग्रेस कार्यकर्ते, समर्थक यांना चार्ज करण्याचं काम केलंय. आपण वेगवेगळ्या मुद्यांवर भाजपचे कार्यकर्ते, समर्थक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म आक्रमकपणे भूमिका मांडताना बघतो.

नरेंद्र मोदी यांच्याबद्दल कुणी बोललं, की कार्यकर्तेच नाही, तर समर्थकही धावून जातात. त्याचवेळी भाजपविरोधी पक्ष, कार्यकर्ते, समर्थक यांची प्रतिक्रिया खूपच मवाळपणे असते. बऱ्याचदा ती प्रतिक्रियाच समोर येत नाही. आपण बोलायचं कसं, भूमिका मांडायची कशी अशा संभ्रमात भाजपविरोधक असतात. पण या यात्रेनिमित्तानं भाजपविरोधी कार्यकर्ते, समर्थक मोठ्या प्रमाणात व्यक्त होताना बघायला मिळाले. एकप्रकारे भारत जोडो यात्रा भाजपविरोधकांना व्होकल बनवणारी ठरताना दिसतेय. तसंच गटातटात विभागलेले गेलेले महाराष्ट्र काँग्रेसचे नेते राहुल गांधींचा हातात हात घेत सोबत चालताना दिसले.

हे वाचलं का?

    follow whatsapp