Mumbai Airport अदानींकडे कसे गेले? राहुल गांधींनी सांगितली क्रोनॉलॉजी
Adani Group | Mumbai Airport : मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंततराष्ट्रीय विमानतळाचे (chhatrapati shivaji maharaj international airport) व्यवस्थापन अदानी समूहाच्या (Adani Group) अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड या कंपनीकडे आहे. यापूर्वी ते जीव्हीके समूहाकडे होते. मात्र दोन वर्षांपूर्वी हे व्यवस्थापन अदानी समूहाकडे हस्तांतरित झाले. पण हे तपास यंत्रणांचा वापर करुन जीव्हीके समूहावर दबाव टाकून झालं […]
ADVERTISEMENT

Adani Group | Mumbai Airport :
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंततराष्ट्रीय विमानतळाचे (chhatrapati shivaji maharaj international airport) व्यवस्थापन अदानी समूहाच्या (Adani Group) अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड या कंपनीकडे आहे. यापूर्वी ते जीव्हीके समूहाकडे होते. मात्र दोन वर्षांपूर्वी हे व्यवस्थापन अदानी समूहाकडे हस्तांतरित झाले. पण हे तपास यंत्रणांचा वापर करुन जीव्हीके समूहावर दबाव टाकून झालं असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलताना केला. (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport is managed by Adani Airport Holding Limited, a company of the Adani Group.)
लोकसभेमध्ये मंगळवारी (7 फेब्रुवारी) राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरु होती. यावेळी राहुल गांधी यांनी अदानी समूह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र डागलं. ते म्हणाले, काही वर्षांपूर्वी सरकराने विमानतळ विकसीत करण्यासाठी दिले. नियम होता की, ज्यांना विमानतळ विकसीत करण्यासाठी द्यायचं आहे, त्यांना त्यातील अनुभव हवा. पण या नियमाला सरकारने बदललं. त्यावेळी माध्यमांमध्ये बरीच चर्चा झाली.
पण नियम बदलले आणि 6 विमानतळं अदानींना दिली. त्यानंतर नफ्यात सुरु असलेल मुंबई विमानतळही अदानींकडे गेलं. कसं? तर जीव्हीके ग्रुपविरुद्ध केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन, त्यांच्यावर दबाव टाकून ते विमानतळ अदानींच्या हवाली केलं. याचा निकाल काय आला? तर आज 24 टक्के विमान वाहतूक अदानींकडे आहे. तर 31 टक्के मालवाहू विमान वाहतूक अदानींकडे आहे, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला.










