एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मुंबईकरांना पत्र

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मनसेच्या वतीनं दरवर्षी आयोजित करणाऱ्यात येणाऱ्या शिवाजी पार्क दीपोत्सवाचा प्रारंभ आजपासून होतोय. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमाला येण्याची ही पहिलीच वेळ असून, त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहे. दरम्यान, याच कार्यक्रमासंदर्भात राज ठाकरेंनी मुंबईकरांना पत्र लिहिलंय.

राज ठाकरेंनी शेजाऱ्यांना, दादरकरांना आणि मुंबईकरांना हे पत्र लिहिलं आहे. हे पत्र मनसेकडून आधी वृत्तपत्रांमधून वितरित करण्यात आलं होतं आणि नंतर सोशल मीडियातूनही प्रसिद्ध करण्यात आलंय.

राज ठाकरेंचं पत्र जसंच्या तसं

माझ्या शिवाजी पार्क शेजाऱ्यांनो,

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

तसेच समस्त दादरकर आणि मुंबईकर जनहो,

दिवाळी आली आणि दिवाळीचा उत्साह सर्वत्र दिसू लागला. गेली काही वर्ष करोनामुळे दिवाळी थोडी झाकोळलेली होती, परंतु यावेळेस दिवाळी पुन्हा एकदा नवा उत्साह, आनंद आणि नवी स्वप्नं घेऊन आली आहे.

ADVERTISEMENT

दिवाळी आणि शिवतीर्थ परिसरातली रोषणाई हे आपलं समीकरणं गेली १० वर्ष सुरू आहे. दरवर्षी आपण शिवतीर्थवर, तिथल्या रस्त्यांवर, झाडांवर रोषणाई करतो. गेली दोन वर्ष करोना असताना सुद्धा आपण त्या परंपरेत खंड पडू दिला नव्हता. यावर्षी देखील आपण ही रोषणाई करून दिवाळीचा आनंद साजरा करणार आहोतच. त्या उत्सवाचं निमंत्रण देण्यासाठी हे पत्र लिहितो आहे.

ADVERTISEMENT

दीपावलीच्या निमित्तानं आपण आपलं घर, आपलं अंगण आणि आपला परिसर दिव्यांनी उजळवून टाकतो. दादरमधील शिवतीर्थाचा परिसर हे मी माझ्या घराचं अंगणच समजतो, म्हणून हे अंगण तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं आणि सहभागानं विविध रंगी लखलखणाऱ्या दिव्यांच्या रोषणाईनं आणि इतर सजावटीनं आपण उजळवून टाकणार आहोत. मला तर वाटतं की प्रत्येकानं आपल्या घराबरोबर आपलं अंगण आणि आपला परिसर असाच सुंदर ठेवला, तर महाराष्ट्र दृष्ट लागावी असा आणि जगाला हेवा वाटेल असा होईल. हे करण्यामागेही माझी तीच भावना आहे.

वसुबारसेपासून तुळशीच्या लग्नापर्यंत आपली रोषणाई आपला परिसर उजळवून टाकते. यावर्षी वसुबारसेला म्हणजे २१ ऑक्टोबरला, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आपण दीप सोहळ्याचे उद्घाटन करणार आहोत. आपण अवश्य यावे, आपल्या कुटुंबातील सर्वांना घेऊन यावं. मित्र मंडळींना सांगावं.

आनंद आपण एकट्याने साजरा करत नाही. त्यात जितकी आप्त, मित्रमंडळी सहभागी होतील तितका तो आनंदाचा सोहळा वाढत जातो. तुम्ही याच आणि इतरांनाही आवर्जून सांगा.

आपल्या सर्वांचा

राज ठाकरे

    follow whatsapp

    ADVERTISEMENT