हिंदूंना हिंदू राहायचं असेल, तर भारताला अखंड बनवावंच लागेल -मोहन भागवत

मुंबई तक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वावर जोर देत भारत आणि हिंदू वेगवेगळे नाहीत, असं म्हटलं आहे. ‘भारताला भारत म्हणून राहायचं असेल, तर भारताला हिंदू म्हणूनच राहावं लागेल. हिंदूंना हिंदू म्हणून राहायचं असेल, तर भारताला अखंड बनवावंच लागेल,’ असं भागवत यांनी एका कार्यक्रमात म्हटलं आहे. मध्य प्रदेशातील ग्वालेर येथे एका कार्यक्रमाचं आयोजन […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वावर जोर देत भारत आणि हिंदू वेगवेगळे नाहीत, असं म्हटलं आहे. ‘भारताला भारत म्हणून राहायचं असेल, तर भारताला हिंदू म्हणूनच राहावं लागेल. हिंदूंना हिंदू म्हणून राहायचं असेल, तर भारताला अखंड बनवावंच लागेल,’ असं भागवत यांनी एका कार्यक्रमात म्हटलं आहे.

मध्य प्रदेशातील ग्वालेर येथे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत यांनी भारत-पाकिस्तान फाळणीकडे लक्ष वेधत अखंड भारताच्या मुद्द्यावर भाष्य केलं.

1930 पासून देशात Muslim समाजाची लोकसंख्या वाढवण्याचा प्रयत्न होतो आहे, RSS प्रमुख मोहन भागवत यांचं वक्तव्य

‘हा हिंदुस्तान आहे आणि इथे परंपरेनं हिंदूच राहत आले आहेत. ज्या-ज्या गोष्टीला हिंदू म्हणून संबोधलं जातं, त्या सगळ्यांच्या विकास या भूमीत झाला आहे. भारताच्या सर्व गोष्टी भारताच्या भूमीशी जोडलेल्या आहेत. हा योगायोग नाहीये,’ असं सरसंघचालक भागवत म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp