सचिन वाझेंचे मालक काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत बसले आहेत-फडणवीस

मुंबई तक

महाराष्ट्राची जेवढी बदनामी वाझे प्रकरणामुळे झाली आहे तेवढी दुसऱ्या कोणत्याही प्रकरणाने झालेली नाही. नवाब मलिक हे का चिंतेत आहेत ते मला व्यवस्थित माहित आहे कारण त्यामुळे सत्तेत असणाऱ्या अनेकांचं बिंग फुटतंय. मी केंद्रीय गृह सचिवांना जे पत्र दिलं आहे त्यामुळे सत्ताधाऱ्यांना चिंता वाटू लागली आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये म्हटलं आहे. ज्या रिपोर्टमुळे महाराष्ट्र […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्राची जेवढी बदनामी वाझे प्रकरणामुळे झाली आहे तेवढी दुसऱ्या कोणत्याही प्रकरणाने झालेली नाही. नवाब मलिक हे का चिंतेत आहेत ते मला व्यवस्थित माहित आहे कारण त्यामुळे सत्तेत असणाऱ्या अनेकांचं बिंग फुटतंय. मी केंद्रीय गृह सचिवांना जे पत्र दिलं आहे त्यामुळे सत्ताधाऱ्यांना चिंता वाटू लागली आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये म्हटलं आहे. ज्या रिपोर्टमुळे महाराष्ट्र पोलिसांची बदनामी झाली तो रिपोर्ट तर नवाब मलिक यांनीच पत्रकारांना दिला. मी तर फक्त कव्हरिंग लेटर दिलं होतं. सर्वात जास्त बदनामी झाली आहे ती वाझे प्रकरणामुळेच आणि सत्तेत बसलेल्या त्यांच्या मालकांना आता चिंता वाटू लागली आहे.

सचिन वाझे ते परमबीर सिंग प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शांत का?

आणखी काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

महाराष्ट्राची जेवढी बदनामी वाझे प्रकरणामुळे झाली आहे तेवढी कोणत्याही प्रकरणामुळे झालेले नाही. फोन टॅपिंगचा जो रिपोर्ट जो मी केंद्राकडे सोपवला आहे त्यामुळे अनेकांचं बिंग फुटणार आहे. महाराष्ट्र पोलिसांची बदनामी करणारा रिपोर्ट नवाब मलिक यांनीच फोडला आहे. माझा प्रश्न असा आहे की सिंडिकेट राज चालवल्याने, बदल्यांमध्ये पैसे घेतल्याने आणि वाझेसारख्या लोकांना सेवेत घेतल्याने महाराष्ट्र पोलीस बदनाम झाले की त्यांचं नाव झालं? वाझेंचे मालक आता अहवाल NIA कडे गेल्याने चिंतेत आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp