Sameer Wankhede: समीर वानखेडेंना हटवलं की नाही? एनसीबीने काय म्हटलं?

मुंबई तक

मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) वादग्रस्त अधिकारी समीर वानखेडे यांना आर्यन खान प्रकरणाच्या तपासातून हटवण्यात आलं की नाही यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांनी वेगवेगळे दावे केले आहेत. अशातच आता खुद्द एनसीबीनंही एक खुलासेवजा निवेदन जारी केलं आहे. त्यामुळे नेमका कोणाचा काय दावा आहे हे जाणून घेऊयात सविस्तरपणे. शुक्रवारी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) वादग्रस्त अधिकारी समीर वानखेडे यांना आर्यन खान प्रकरणाच्या तपासातून हटवण्यात आलं की नाही यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांनी वेगवेगळे दावे केले आहेत. अशातच आता खुद्द एनसीबीनंही एक खुलासेवजा निवेदन जारी केलं आहे. त्यामुळे नेमका कोणाचा काय दावा आहे हे जाणून घेऊयात सविस्तरपणे.

शुक्रवारी 5 नोव्हेंबरला संध्याकाळी एक बातमी समोर आली. त्यानुसार, समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खान प्रकरणासह 6 बहुचर्चित केसेसचा तपास काढून घेण्यात आला. त्यांना तपासातून वगळण्यात आलं. कॅबिनेटमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनीही ट्विट करून वानखेडेंना हटवण्यात आल्याचा दावा केला.

नवाब मलिक लिहितात, ‘आर्यन खानसह 5 प्रकरणांच्या तपासातून समीर वानखेडे यांना हटवण्यात आलं आहे. अजून 26 प्रकरणं आहेत, ज्यांची चौकशी होणं गरजेचं आहे. ही तर फक्त सुरवात आहे, ही यंत्रणा सुधारण्यासाठी खूप काही करणं गरजेचं आहे आणि आम्ही ते करु.’

दरम्यान, दुसरीकडे समीर वानखेडे यांनीही मलिकांच्या या ट्विटनंतर काही वेळातच या संपूर्ण घडामोडीबद्दल ‘मुंबई तक’शी बोलताना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले,

हे वाचलं का?

    follow whatsapp