मोदींना खडेबोल, अमित शाहांच्या भूमिकेवरच सवाल; संजय राऊतांचं ‘रोखठोक’ भाष्य

मुंबई तक

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळल्यानंतर दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची बैठक बोलावली. या बैठकीत परिस्थिती जैसे थे ठेवण्यावर संमती झाली. या बैठकीवरून संजय राऊतांनी रोखठोक मध्ये भाष्य केलं असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींना खडेबोल सुनावत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भूमिकेबद्दल सवाल उपस्थित केलाय. संजय राऊत रोखठोक […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळल्यानंतर दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची बैठक बोलावली. या बैठकीत परिस्थिती जैसे थे ठेवण्यावर संमती झाली. या बैठकीवरून संजय राऊतांनी रोखठोक मध्ये भाष्य केलं असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींना खडेबोल सुनावत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भूमिकेबद्दल सवाल उपस्थित केलाय.

संजय राऊत रोखठोक सदरात म्हणतात, ‘आज बेळगावकरांचा आवाज महाराष्ट्रात येण्यासाठी बुलंद आहे. ते संघर्ष करतात, पण या लढाईतून कारवारने केव्हाच माघार घेतली. त्यामुळे लढा मुख्यतः बेळगाव, निपाणीसह 56 गावांचा आहे व तो आता सर्वोच्च न्यायालयातही 2004 सालापासून सुस्तावलेल्या अजगराप्रमाणे पडून आहे. राममंदिराचा प्रश्न राजकीय झाला तेव्हा त्यावर सलग सुनावणी करून तो मार्गी लावला गेला; मग महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सलग सुनावणी घेऊन त्या प्रश्नाचा एकदाचा निकाल का लागू नये?’, असा सवाल करत संजय राऊतांनी भाजपला लक्ष्य केलंय.

“ज्या प्रश्नासाठी आतापर्यंत 69 लोकांनी बलिदान दिले व ज्यासाठी आजही संघर्ष सुरूच आहे त्या प्रश्नी केंद्र सरकारने एकदाही हस्तक्षेप केला नाही व दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी एकत्र येऊन चर्चा केली नाही. ती चर्चा आता फक्त 15 मिनिटे झाली. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला डिवचले. त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. शिंदे-फडणवीस सरकारची ‘छी। थू’ झाल्यावर ही बैठक दिल्लीत झाली,” अशी टीका राऊतांनी दिल्लीत झालेल्या बैठकीबद्दल केलीये.

Shiv Sena: महामोर्चा सुरु असतानाच ठाकरेंना मोठा धक्का, ‘तो’ आमदार शिंदेंच्या वाटेवर?

हे वाचलं का?

    follow whatsapp