Prasad Lad: ‘राजकीय गांजाडयांना मराठी माणूस सेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपतील,’ राऊतांची प्रसाद लाडांवर बोचरी टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: भाजपचे (BJP) विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी शिवसेना भवन (Shiv Sena Bhavan) फोडण्याची भाषा केल्यानंतर शिवसैनिक प्रचंड संतापले आहेत. प्रसाद लाड यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेचे (Shiv Sena) अनेक नेते प्रसाद लाड आणि भाजपवर जोरदार टीका करत आहेत. अशाच वेळी आता शिवसेनेचे खासदार आणि ज्येष्ठ नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील प्रसाद लाड यांचा खरपूस समाचार घेतला आहे.

‘राजकीय गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपलयाशिवाय राहणार नाही.( समझनेवालोंको इशारा काफी है..)’ अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर संजय राऊतांची बोचरी टीका

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘महाराष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. नाहीतर राजकीय गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपलयाशिवाय राहणार नाही. ( समझनेवालोंको इशारा काफी है..) शिवसेना भवन हे मराठी अस्मितेचे ज्वलंत प्रतीक आहे. बाटगयांना हे कसे समजणार?’ अशा शब्दात संजय राऊत यांनी प्रसाद लाड यांना सुनावलं आहे.

दरम्यान, रविवारी सकाळी माध्यमांनी संवाद साधताना पत्रकारांनी त्यांना याचविषयी जेव्हा विचारलं होतं. तेव्हा संजय राऊत फक्त एवढंच म्हणाले की, ‘आमचे शाखाप्रमुख बोलतील’ अशी प्रतिक्रिया देत संजय राऊत यांनी प्रसाद लाड यांना अनुल्लेखाने मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, थोड्याच वेळापूर्वी त्यांनी ट्विट करुन प्रसाद लाड यांच्यावर चौफेर टीका केली आहे.

ADVERTISEMENT

‘काही माणसं गांजा पिऊन बोलतात, त्यांच्याकडे कुठे लक्ष द्यायचं’

ADVERTISEMENT

संजय राऊत यांनी प्रसाद लाड यांच्यासह भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर देखील टीका केली आहे. कारण नितेश राणे यांनी असं म्हटलेलं होतं की, ‘शिवसेना भवन हे कलेक्शन झालेलं आहे.’ याच टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देताना असं म्हटलं की.. ‘काही माणसं गांजा पिऊन बोलतात, त्यांच्याकडे कुठे लक्ष द्यायचं’ असं म्हणत राऊतांनी नितेश राणेंवर देखील निशाणा साधला.

प्रसाद लाड यांनी नेमकं काय म्हणाले होते?

‘भाजपची ताकद काय आहे हे २०१४ विधानसभा निवडणुकीत आपण दाखवलंय. कारण, त्यावेळी भाजप होती. भाजपच्या विचारांना मानणारा कार्यकर्ता मतदार होता, तो आज पण भाजपसोबत आहे. त्यात आता सोने पे सुहागा हुआ है. नारायण राणे साहेबांना आणि राणे कुटुंबाला मानणारा स्वाभिमानचा एक मोठा गट राणेंच्या निमित्ताने भाजपात आला आहे.’

‘यामुळे भाजपची ताकद ही निश्चित दुप्पट झाली आहे. नितेशजी पुढच्या वेळेस आपण कार्यकर्ते हे थोडे कमीच आणू. कारण, आपण आलो की पोलिसही खूप येतात. फक्त त्यांना सांगायचं की वर्दी घालून पाठवू नका, म्हणजे हॉलमध्ये बसायला उपयोग होईल. त्यांचं कारण एवढी भीती तुमची आमची की त्यांना वाटतं की हे माहिममध्ये आले म्हणजे शिवसेना भवन फोडणारच. काही घाबरु नका, वेळ आली तर ते देखील करु’, असं लाड म्हणाले होते.

Shiv Sena विषयीच्या ‘त्या’ वक्तव्याबाबत BJP आमदार प्रसाद लाड यांची पलटी, मीडियावर फोडलं खापर

प्रसाद लाड यांची पलटी, मीडियावर फोडलं खापर

दरम्यान, या प्रकरणी टीकेची झोड उठताच आमदार प्रसाद लाड यांनी तात्काळ पलटी मारली आणि या सगळ्याचं खापर मीडियावर फोडून मोकळे झाले.

‘आज प्रसारमाध्यमातून माझ्या एका भाषणाचा विपर्यास करुन मी शिवसेना भवन फोडणार अशा प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्या. परंतु या गोष्टीचा मी फार स्पष्टपणे स्पष्टीकरण करु इच्छितो की, घाबरण्याचं कुठलंही कारण नाही, जेव्हा-जेव्हा कारे ला आरे होईल तेव्हा आरेला कारेचं उत्तर दिलं जाईल.’

‘परंतु, ज्या शिवसेनाप्रमुखांवर आम्ही प्रेम करतो, कोणत्याही पक्षाचे असलो तरीही शिवसेनाप्रमुखांबाबत आम्ही आदर ठेवतो. त्या शिवसेनाप्रमुखांच्या शिवसेना भवनाबाबत असं माझ्याकडून देखील कुठलंही चुकीचं वक्तव्य कधी केलं जाणार नाही.’

‘माझं स्पष्टपणे भाषणामध्ये म्हणणं होतं की, आम्ही माहिममध्ये जेव्हा कधी येतो तेव्हा एवढा पोलीस बंदोबस्त ठेवला जातो की, जणू काही आम्ही शिवसेना भवनच फोडायलाच जाणार आहोत. त्या बातमीचा विपर्यास करुन ती जी दाखवली गेली आहे त्यासाठी माझं हे स्पष्टीकरण आहे की, मला कोणत्याही प्रकारे शिवसेनाप्रमुख आणि शिवसेनाप्रमुखांनी बांधलेल्या वास्तूचा अनादर करायचा नव्हता. त्यामुळे जर मी कुणाचं मन दुखावलं असेल तर त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो.’ अशी प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी दिली.

वेळ आली तर Shivsena Bhavan ही तोडू, BJP आमदार प्रसाद लाड यांचं वादग्रस्त वक्तव्य

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावरुन आता शिवसेना आणि भाजप पुन्हा एकदा आमनेसामने आली आहे. अशावेळी आता येत्या काळात काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT