Sanjay Raut: खरी जनाब सेना कोण हे महाराष्ट्राला सांगणार.., राऊतांची भाजपवर तुफान टीका

मुंबई तक

मुंबई: ‘खरी जनाब सेना कोण हे शिवसेना महाराष्ट्रभरात जाऊन सांगणार आहे. एमआयएम आणि भाजप यांची हातमिळवणी आहे.’ असं वक्तव्य आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले: शिवसेना भवनात मुंबई, ठाण्यातील सगळे प्रमुख पदाधिकारी, खासदार आणि नेते बसलो विश्व संपर्क मोहीम 22 तारखेपासून सुरु होत आहे शिवसेनेकडून मराठवाडा आणि […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: ‘खरी जनाब सेना कोण हे शिवसेना महाराष्ट्रभरात जाऊन सांगणार आहे. एमआयएम आणि भाजप यांची हातमिळवणी आहे.’ असं वक्तव्य आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे.

पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले:

शिवसेना भवनात मुंबई, ठाण्यातील सगळे प्रमुख पदाधिकारी, खासदार आणि नेते बसलो विश्व संपर्क मोहीम 22 तारखेपासून सुरु होत आहे शिवसेनेकडून मराठवाडा आणि विदर्भात आमच्या नेत्यांचे दौरे होणार आहे. जे शिवसेनेविषयी गैरसमज परसवले जात आहेत भाजपकडून खास करुन त्यांचा जो उबग, विष, जळफळाट जो बाहेर पडतोय आमच्याविषयी त्याला उत्तर द्यायचंय. त्या संदर्भात उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन केलं.

कसली जनाब सेना? शिवसेना ही प्रखर हिंदुत्ववादी आहे. शिवसेनेच्या हिंदुत्वावादात कोणत्याही प्रकारची भेसळ न झाली ना आम्ही होऊ देणार. जे आम्हाला जनाब सेना म्हणतायेत त्यांनी त्यांचा इतिहास त्यांची कर्तबगारी तपासून पाहावी. काश्मीरच्या संदर्भात आज जे आम्हाला अक्कल शिकवतायेत ते काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी हातमिळवणी करुन सरकार स्थापन करणारा हाच भारतीय जनता पक्ष होता. मेहबुबा मुफ्ती सोबत कोणी सरकार स्थापन केलं. आम्ही तेव्हाही ओरडत होतो. की, हे पाकिस्तानवादी आहेत, फुटीतरतावादी आहेत. हे अतिरेक्यांशी, अफजल गुरुंशी हातमिळवणी करणारे आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp