“देशात तेवढेच करायचे बाकी”, उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींना पुन्हा डिवचलं
Uddhav Thackeray, Narendra Modi, Gautam Adani, ED raids : ईडी, सीबीआयच्या विरोधकांवरील धाडी, चौकशा आणि अटक सत्रावरून शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. विरोधकांकडून सातत्याने अदानींवरून मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न होत आहे. शिवसेनेनंही याच मुद्द्यावर बोट ठेवत मोदींना डिवचलं आहे. (Shiv Sena UBT attacks Modi Government over ed, Cbi raids) […]
ADVERTISEMENT

Uddhav Thackeray, Narendra Modi, Gautam Adani, ED raids : ईडी, सीबीआयच्या विरोधकांवरील धाडी, चौकशा आणि अटक सत्रावरून शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. विरोधकांकडून सातत्याने अदानींवरून मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न होत आहे. शिवसेनेनंही याच मुद्द्यावर बोट ठेवत मोदींना डिवचलं आहे. (Shiv Sena UBT attacks Modi Government over ed, Cbi raids)
सामना अग्रलेखातून शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मोदी सरकारच्या काळाची आणीबाणीपेक्षाही भयंकर स्थिती असं वर्णन केलं आहे.
सामना अग्रलेखात म्हटलं आहे की, “देशाने 1975 च्या कालखंडात इंदिरा गांधी यांनी लादलेली आणीबाणी अनुभवली आहे. त्या काळ्याकुट्ट कालखंडास लाज वाटावी इतक्या बेगुमान पद्धतीने भाजपचे राज्यकर्ते आज वागत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचा बेकायदेशीर वापर करून राजकीय विरोधकांना नेस्तनाबूत करण्याचे कार्य अखंड सुरू आहे. ही अघोषित नव्हे, तर घोषित हुकूमशाही देशात सुरू झाल्याची लक्षणे आहेत. गेल्या दोन दिवसांत विरोधी पक्षांतील अनेकांवर ‘ईडी’ने छापे मारले व काहींना अटका केल्या, पण या अशा सर्व कारवायांपासून भाजपचे अतिप्रिय गौतमभाई अदानी सर्व करून सवरून मोकळे आहेत. त्यांना मोदी सरकारने सुरक्षेची विशेष कवचकुंडले बहाल केली आहेत.”
Corrupt Manus एकनाथ शिंदे : आदित्य ठाकरेंनी सांगितला CM शब्दाचा नवीन अर्थ