केंद्रीय मंत्र्यांना जेवताना अटक, कोणत्या तोंडाने म्हणता आकसाने कारवाई झाली? – विनायक मेटे

मुंबई तक

– राकेश गुडेकर, रत्नागिरी प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना सुरु झाला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊन इब्राहीमच्या हस्तकासोबत केलेल्या मालमत्तेच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने मलिकांना अटक केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांची ही कारवाई म्हणजे मलिकांवर राग काढण्याचा प्रकार असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

– राकेश गुडेकर, रत्नागिरी प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना सुरु झाला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊन इब्राहीमच्या हस्तकासोबत केलेल्या मालमत्तेच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने मलिकांना अटक केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांची ही कारवाई म्हणजे मलिकांवर राग काढण्याचा प्रकार असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. नवाब मलिक हे गेल्या काही दिवसांपासून तपास यंत्रणांविरुद्ध बोलत होते, त्यामुळे अशी काहीतरी कारवाई होईल याची कल्पना होतीच असंही शरद पवार यांनी सांगितलं.

महाविकास आघाडीच्या या टीकेचा समचारा घेताना शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी नारायण राणेंना झालेल्या अटकेचा दाखला घेत, केंद्रीय मंत्र्यांना जेवत असताना अटक करण्यात आली. त्यामुळे आता तुम्ही कोणत्या तोंडाने आकसाने कारवाई झाली असं बोलू शकता असा प्रश्न विचारला आहे.

सत्तेच्या गैरवापराचं हे उदाहरण, अशी कारवाई होईल याची कल्पना होतीच – शरद पवार

हे वाचलं का?