स्मशानभूमीही गहिवरली: Corona मृत्यू झालेल्या 19 मृतदेहांवर उस्मानाबादमध्ये एकाचवेळी अंत्यसंस्कार

मुंबई तक

उस्मानाबाद येथील स्मशानभूमीही बुधवारी गहिवरली कारण कोरोनाने मृत्यू झालेल्या 19 रूग्णांच्या मृतदेहांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.उर्वरित आठ मृतदेह हे जागा नसल्याने प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. त्यावर आज (गुरूवार) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बुधवारचे स्मशानभूमीतील चित्र मन हेलावून टाकणारे होते. उस्मानाबाद नगर परिषदेच्या वतीने कोरोनाचे सगळे नियम पाळून अंत्यसंस्कार करण्यात आले. Corona मृत्यूचं तांडव! अहमदनगरमध्ये […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

उस्मानाबाद येथील स्मशानभूमीही बुधवारी गहिवरली कारण कोरोनाने मृत्यू झालेल्या 19 रूग्णांच्या मृतदेहांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.उर्वरित आठ मृतदेह हे जागा नसल्याने प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. त्यावर आज (गुरूवार) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बुधवारचे स्मशानभूमीतील चित्र मन हेलावून टाकणारे होते. उस्मानाबाद नगर परिषदेच्या वतीने कोरोनाचे सगळे नियम पाळून अंत्यसंस्कार करण्यात आले.

Corona मृत्यूचं तांडव! अहमदनगरमध्ये 29 मृतदेहांवर एकाचवेळी सरण रचून अंत्यसंस्कार

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर झाला असून बेड , रेमडीसीवीर इंजेक्शन , ऑक्सिजन साठा संपत आला आहे, कोरोनाने आजवर 643 मृत्यू झाला आहे तर 4 हजार 940 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. उस्मानाबाद तालुक्यात सर्वाधिक 307 रुग्ण सापडले तर तुळजापूर 40, उमरगा तालुक्यात 74 रुग्णांचा समावेश आहे. दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढतो आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 4 हजार 940 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत त्यामुळे रुग्णालयात रुग्णाची गर्दी झाली आहे. उस्मानाबाद शहर व तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनत असून नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात बुधवारपर्यंत 1 लाख 77 हजार 613 नमुने तपासले त्यापैकी 26 हजार 467 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. जिल्ह्यात 20 हजार 884 रुग्ण बरे झाले असून 79.99 टक्के हा रिकव्हरी रेट आहे. तर 643 रुग्णांचा मृत्यू झाला असून 2.44 टक्के मृत्यू दर आहे.

कोरोनाची कोणतीही लक्षणे असल्यावर ती अंगावर न काढता तातडीने रुग्णालयात जाणे गरजेचे आहे आहे असे आवाहन सतत जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केलं आहे.

महाराष्ट्रात Corona मृत्यूदर घटला आहे… पण मृत्यू नाही.. हे आहे कारण

याआधी अहमदनगरचीही अशीच एक बातमी समोर आली होती. अहमदनगरमधल्या विद्युतदाहिनीत एका वेळी 20 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. अहमदनगरमध्ये 49 कोरोना मृत्यू झाले. त्यापैकी 20 मृतदेहांवर विद्युत दाहिनीमध्ये अंत्यंस्कार करण्यात आले. मात्र उर्वरित 29 मृतदेहांवर एकाचवेळी सरण रचून अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली होती. या बातमीनेही कोरोना मृत्यूंच्या दाहकतेची कल्पना दिली होतीच. आता पुन्हा एकदा उस्मानाबादमध्ये अशीच घटना घडली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp